राजीव शुक्ला होणार BCCI चे अध्यक्ष ?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI / Board of Control for Cricket in India) अध्यक्ष रॉजर बिन्नी १९ जुलै रोजी ७० वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमानुसार अध्यक्षांचे वय ७० पेक्षा जास्त असून चालत नाही. या कारणामुळे रॉर बिन्नी लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नव्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत राजीव शुक्ला यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव शुक्ला यांना तीन महिन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाईल.

राजीव शुक्ला ६५ वर्षांचे आहेत आणि अनेक वर्षांपासून बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत. त्यांचा आतापर्यंतचा कामाचा अनुभव बघता त्यांचाच भविष्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी विचार होण्याचीही शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत उतरुन राजीव शुक्ला अध्यक्षपदासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

रॉजर बिन्नी २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष आहेत. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष होता. गांगुलीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर झालेल्या निवडणुकीसाठी फक्त रॉजर बिन्नी यांचाच उमेदवारी अर्ज आला. यामुळे रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. बिन्नी अध्यक्ष असतानाच्या काळात भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या दोन मर्यादीत षटकांच्या स्पर्धा जिंकल्या. भारताने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. रॉजर बिन्नी यांच्या काळात ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग सुरू झाली. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन मिळाले. खेळाडूंचे वेतन वाढवण्यात आले आणि टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी योग्य आणि कठोर पावले उचलण्यात आली.



रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू होते. अष्टपैलू असलेल्या बिन्नी यांनी २७ कसोटी सामने आणि ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४७ बळी घेतले आणि पाच अर्धशतकांसह ८३० धावा केल्या. तसेच ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ बळी घेतले. एका अर्धशतकासह ६२९ धावा केल्या. बिन्नी यांनी १९८३ च्या विश्वचषकात १८ बळी घेतले होते. बिन्नी यांनी यापूर्वी बीसीसीआय निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
Comments
Add Comment

KKR vs MI : KKR च्या विजयाने राजस्थानचं टेन्शन वाढलं, प्लेऑफचं गणित पुन्हा बदललं

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) ४

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व