राजीव शुक्ला होणार BCCI चे अध्यक्ष ?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI / Board of Control for Cricket in India) अध्यक्ष रॉजर बिन्नी १९ जुलै रोजी ७० वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमानुसार अध्यक्षांचे वय ७० पेक्षा जास्त असून चालत नाही. या कारणामुळे रॉर बिन्नी लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नव्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत राजीव शुक्ला यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव शुक्ला यांना तीन महिन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाईल.

राजीव शुक्ला ६५ वर्षांचे आहेत आणि अनेक वर्षांपासून बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत. त्यांचा आतापर्यंतचा कामाचा अनुभव बघता त्यांचाच भविष्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी विचार होण्याचीही शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत उतरुन राजीव शुक्ला अध्यक्षपदासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

रॉजर बिन्नी २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष आहेत. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष होता. गांगुलीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर झालेल्या निवडणुकीसाठी फक्त रॉजर बिन्नी यांचाच उमेदवारी अर्ज आला. यामुळे रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. बिन्नी अध्यक्ष असतानाच्या काळात भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या दोन मर्यादीत षटकांच्या स्पर्धा जिंकल्या. भारताने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. रॉजर बिन्नी यांच्या काळात ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग सुरू झाली. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन मिळाले. खेळाडूंचे वेतन वाढवण्यात आले आणि टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी योग्य आणि कठोर पावले उचलण्यात आली.



रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू होते. अष्टपैलू असलेल्या बिन्नी यांनी २७ कसोटी सामने आणि ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४७ बळी घेतले आणि पाच अर्धशतकांसह ८३० धावा केल्या. तसेच ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ बळी घेतले. एका अर्धशतकासह ६२९ धावा केल्या. बिन्नी यांनी १९८३ च्या विश्वचषकात १८ बळी घेतले होते. बिन्नी यांनी यापूर्वी बीसीसीआय निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
Comments
Add Comment

IPL 2026 MI vs SRH : वानखेडेवर मुंबईचा पुन्हा पराभव, हैदराबादचा दमदार ६ विकेट्सने विजय

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद ने मुंबई इंडियन्स ला ६ विकेट्सने पराभूत करत शानदार

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा