एसटी प्रवासात आता पुरुषांनाही मिळणार १०-१५ टक्के सवलत

मुंबई: एसटीच्या प्रवासात आता महिलांप्रमाणे पुरुषांना देखील एसटी प्रवासात सवलत मिळणार आहे. आता एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे रविवारी (दि.१) आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.



फ्लेक्सी फेअर योजना


मंत्री सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या प्रवासात आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची मोठी घोषणा केली. कमी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढावी हा यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. या योजनेचा उद्देश प्रवाशांना परवडणारा आणि आकर्षक प्रवासाचा अनुभव देणे आहे.

जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येतेय. तसेच एसटीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था बनवण्याचे ध्येय ठेवले असून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेही आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, "गेल्या 77 वर्षांपासून एसटीने ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत सर्वांना सातत्याने प्रवासी सेवा दिली आहे. देशात 75 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलेल्या मोजक्याच संस्था आहेत आणि एसटी त्यापैकी एक आहे. एसटीचे सामाजिक महत्त्व 77 वर्षांनंतरही अजिबात कमी झालेले नाही. भविष्यातील दळणवळण क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६