'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो' अभियानास प्रारंभ

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. या अतिरेकी व्यसनातून सोडविण्यासाठी 'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो' अभियान सुरु करत आहोत, मुंबईकरांनी या महाअभियानात मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन 'शांतीदूत सेवा संस्थे'चे अध्यक्ष व भायखळ्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय (बुवा) कुलकर्णी यांनी केले आहे.


'सबुरी वस्ती स्तर संघ' आणि 'शांतीदूत सेवा संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील राणीबाग जवळील लुनावा भवन सभागृहात 'दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी शिक्षण तज्ज्ञ व बिझनेस कोच सुशील भालचंद्र मुणगेकर, लेखक व चित्रपट निर्माते ज्ञानेश्वर विश्वनाथ मर्गज यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.


'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो अभियाना'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर, महापुरुषांची चरित्रे, स्पर्धा परीक्षा यांसारखी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, यासाठी ग्रंथालये उभारण्याचा मानसही कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सुशील भालचंद्र मुणगेकर यांनीही पालक व विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक व प्रशिक्षक सुगत प्रिय शिंदे, पत्रकार महेंद्र गावडे, सतीश खांडगे, गणेश धायगावे, दर्शन सावंत, संजय साळुंके, रमेश गोड, संजय पन्हाळकर, दिपाली कन्नन नायडू, अर्चना रमेश गोड, नैना लोगडे, श्रीया सचिन शिंदे, वैशाली पवार, कन्नन नायडू, सचिन शिंदे, दर्शना सावंत, स्वप्नाली जाधव, जयेश आंब्रे, डॉली साव, अश्विनी नवघणे, पल्लवी जाधव, मोहम्मद युसूफ शेख, अब्दुल अली खान, रमेश गोड, राज धायगावे, सुभाष वळंजू, अशोक पांचाळ, गणेश थोरात यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments

Kulkarni    June 6, 2025 02:38 PM

Instead of writing Double name of Darshana Sawant, ramesh Goad, you should add new names Vaishali Umesh Jangam and Prnjal Raju More. And the english speech given by Pratibha Nikhil Gade.

Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक