सिक्कीम : सिक्कीमच्या लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

गंगटोक : ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवाला आहे. सिक्कीममधील एक लष्करी छावणीत रविवारी (दि.१) संध्याकाळी भूस्खलन झाले. यामध्ये काही सैनिकांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर ९ जवान बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.


तीन जणांचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम रबवली जात आहे.

१५०० पर्यटक अडकले


उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले की, ११५ पर्यटक लाचेनमध्ये आणि १,३५० पर्यटक लाचुंगमध्ये राहत आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Comments
Add Comment

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान

मुंबई: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. या

मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : कोकणवासीयांच्या अनेक मागण्या मांडल्या सविस्तर

वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक

धक्कादायक, ३० हजार फूट उंचीवर ९४ मिनिटे मृत्यूला चकवून अफगाणिस्तानमधून भारतात आला मुलगा

नवी दिल्ली : अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय... विमानाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. एक १३ वर्षांचा

गायक झुबीन गर्ग अनंतात विलीन

कामरूप : आसाममधील कामरूप जिल्ह्यातील कामरकुची एनसी गावात लोकप्रिय गायक झुबीन गर्गवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Money : आता वर्षाला २.५ लाखांपर्यंत होणार तुमची बचत...

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आजपासून नवीन जीएसटी दर लागू केले. या महत्वपूर्ण निर्णयामुळे

अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालय नाराज

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर AI-171 विमानाचा १२ जून २०२५ रोजी भीषण अपघात झाला