शहरातील रस्त्यामधील दुभाजकही सौंदर्याने फुलणार

पालिकेकडून ५३ हजार शोभिवंत झाडांचे नियोजन


वसई : वसई-विरार शहरात विविध प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण वाढू लागले आहे. हे प्रदूषण नियंत्रणासोबतच त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहराला प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी तसेच हवेतील प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेने यंदा शहराच्या विविध ठिकाणच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकांच्या मध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.


रस्त्याच्या मध्य भागी असलेल्या दुभाजकांच्या मध्येही व प्रमुख सर्कलच्या मध्ये विविध प्रकारची शोभिवंत ५३ हजार ६४१ इतक्या झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात दुभाजकही सौंदर्याने फुलणार आहेत. नव्याने तयार होणारे दुभाजक व यापूर्वीचे जे दुभाजक मोकळ्या स्थितीत आहेत अशा ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना ही हिरवळ दिसून येईल. याशिवाय या झाडांमुळे पालिकेच्या शहर सौंदर्यात ही भर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.




यापूर्वी २४ ठिकाणी लागवड


यापूर्वी शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) ८५ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. यासाठी शहरातील २४ ठिकाणी असलेल्या दुभाजकांची निवड करून दुभाजकांच्या मध्ये विविध प्रकारची शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली होती.




वसई-विरार शहरातील दुभाजकांच्या मध्येही शोभिवंत झाडे वृक्ष प्राधिकरण विभागाकडून लावली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- समीर भूमकर, उपायुक्त वृक्ष प्राधिकरण विभाग महापालिका


Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक