Pratap Sarnaik: हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांनी मांडली आपली बाजू

मुंबई: मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली. यादरम्यान त्यांनी हिंदीला लाडकी बहीण असे देखील म्हंटले होते, मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.


'मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे,' असे स्पष्टीकरण सरनाईकांनी दिले आहे. तसेच माध्यमांनी बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही त्यांनी म्हंटलं आहे.



माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो


मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यात कृपाशंकर सिंह यांच्या मुद्द्यांवर पुढे मी बोललो. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो. पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत. तिथं हिंदीच बोलावं लागतं. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, "माझ्या मतदारसंघात मी विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मोठ्या लेखक, साहित्यिकांची नावं रस्त्यांना दिली आहेत. मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठीचाही सर्वाधिक सन्मान केला आहे."

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.