Pratap Sarnaik: हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांनी मांडली आपली बाजू

मुंबई: मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली. यादरम्यान त्यांनी हिंदीला लाडकी बहीण असे देखील म्हंटले होते, मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.


'मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे,' असे स्पष्टीकरण सरनाईकांनी दिले आहे. तसेच माध्यमांनी बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही त्यांनी म्हंटलं आहे.



माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो


मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यात कृपाशंकर सिंह यांच्या मुद्द्यांवर पुढे मी बोललो. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो. पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत. तिथं हिंदीच बोलावं लागतं. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, "माझ्या मतदारसंघात मी विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मोठ्या लेखक, साहित्यिकांची नावं रस्त्यांना दिली आहेत. मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठीचाही सर्वाधिक सन्मान केला आहे."

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची