Pratap Sarnaik: हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांनी मांडली आपली बाजू

मुंबई: मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली. यादरम्यान त्यांनी हिंदीला लाडकी बहीण असे देखील म्हंटले होते, मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.


'मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे,' असे स्पष्टीकरण सरनाईकांनी दिले आहे. तसेच माध्यमांनी बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही त्यांनी म्हंटलं आहे.



माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो


मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यात कृपाशंकर सिंह यांच्या मुद्द्यांवर पुढे मी बोललो. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो. पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत. तिथं हिंदीच बोलावं लागतं. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, "माझ्या मतदारसंघात मी विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मोठ्या लेखक, साहित्यिकांची नावं रस्त्यांना दिली आहेत. मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठीचाही सर्वाधिक सन्मान केला आहे."

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२