PBKS vs MI: मुंबई-पंजाब सामन्यात पावसाबाबत वेगळा आहे नियम, जाणून घ्या

  58

मुंबई: पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी १ जूनला आयपीएलचा दुसऱा क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. मात्र सामना सुरू होण्याआधीच पावसाने अडथळा निर्माण केला आहे.

साधारणपणे आयपीएलच्या सामन्याचा निकाल साडेअकरा वाजेपर्यंत येतो. मात्र दुसऱ्या क्वालिफायरबाबत आयपीएलचा नियम वेगळा आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पाऊस सुरू असल्याने सामन्याचा निकाल उशीरा रात्री १ वाजेपर्यंत येऊ शकतो.

आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना २ तास उशिराने सुरू केला जाऊ शकतो. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. मात्र या सामन्यासाठी अधिकतर १२० मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला आहे.

मुंबई-पंजाब सामन्याची वेळ संध्याकाळी साडेसात वाजताची होती. यानुसार जरी साडेनऊ वाजेपर्यंत सामना सुरू झाला असता तरी षटकांत कपात केली गेली नसते. मात्र ९.३०च्या नंतर सामना सुरू झाला तर या वेळेनंतर षटकांमध्ये कपात केली जाईल.
Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर