Onion Price Hike : महाराष्ट्रात कांदा महागणार? कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने केले नुकसान

साठवणुकीच्या अभावामुळे हजारो टन कांदा वाया, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


पुणे: ऐन मे महिन्यातील उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा आणि भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने पीक संपूर्ण नष्ट झाले आहे. तसेच, पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला. यामुळे हजारो टन कांदा कुजून गेल्यामुळे, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाव वाढीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात कांदा महागण्याची दाट शक्यता आहे.



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला, त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. पत्रात म्हटले आहे की, ६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.



नाफेडला पारदर्शक खरेदी करण्याचे आवाहन


संघटनेने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना सुद्धा आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा. ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा, अशी मागणी देखील केली आहे.



कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यास भाव वाढतात, हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे. सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील