Onion Price Hike : महाराष्ट्रात कांदा महागणार? कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने केले नुकसान

साठवणुकीच्या अभावामुळे हजारो टन कांदा वाया, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


पुणे: ऐन मे महिन्यातील उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा आणि भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने पीक संपूर्ण नष्ट झाले आहे. तसेच, पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला. यामुळे हजारो टन कांदा कुजून गेल्यामुळे, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाव वाढीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात कांदा महागण्याची दाट शक्यता आहे.



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला, त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. पत्रात म्हटले आहे की, ६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.



नाफेडला पारदर्शक खरेदी करण्याचे आवाहन


संघटनेने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना सुद्धा आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा. ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा, अशी मागणी देखील केली आहे.



कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यास भाव वाढतात, हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे. सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण