जून-जुलैपासून क्रिकेटमध्ये नवे नियम

३४ षटकांनंतर एकाच चेंडूचा होणार वापर


मुंबई : आयसीसीने प्लेईंग-११ कंडिशन्समध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होणार आहे. तशा सूचना आयसीसीने सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-११च्या परिस्थितीत सगळ्यात मोठे बदल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये होणार आहेत. याला आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे.


सध्याच्या घडीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. पण आता नव्या नियमांनुसार, एका डावात सुरुवातीची ३४ षटकं दोन्ही चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर ३५ व्या षटकापासू एक चेंडू डाव संपेपर्यंत दोन्ही बाजूने वापरला जाईल. ३४ वे षटक संपल्यानंतर आणि ३५ वे षटक सुरु होण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ दोनपैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्याने २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळ झाल्यास एकाच चेंडूचा वापर केला जाईल. जो चेंडू ३४ व्या षटकापर्यंत वापरला जाणार नाही, तो बॅकअप म्हणून ठेवला जाईल.



नियमांमध्ये करण्यात आलेले बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवण्यात येतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने बदलांना मंजुरी दिलेली आहे. लवकरच एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल. १९ वर्षांखालील विश्वचषक टी-२० स्पर्धा, ५० षटकांचे सामने हायब्रिड स्वरुपात खेळवायचे की नाही, याचा निर्णय हा गट घेईल. सिंगापूरमध्ये १७ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनापूर्वी कार्यकारी गट स्थापन होण्याची
शक्यता आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत