३४ षटकांनंतर एकाच चेंडूचा होणार वापर
मुंबई : आयसीसीने प्लेईंग-११ कंडिशन्समध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होणार आहे. तशा सूचना आयसीसीने सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-११च्या परिस्थितीत सगळ्यात मोठे बदल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये होणार आहेत. याला आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे.
सध्याच्या घडीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. पण आता नव्या नियमांनुसार, एका डावात सुरुवातीची ३४ षटकं दोन्ही चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर ३५ व्या षटकापासू एक चेंडू डाव संपेपर्यंत दोन्ही बाजूने वापरला जाईल. ३४ वे षटक संपल्यानंतर आणि ३५ वे षटक सुरु होण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ दोनपैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्याने २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळ झाल्यास एकाच चेंडूचा वापर केला जाईल. जो चेंडू ३४ व्या षटकापर्यंत वापरला जाणार नाही, तो बॅकअप म्हणून ठेवला जाईल.
PBKS vs MI, Qualifier 2 : आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने भिडणार आहेत. पंजाबला क्वालिफायर १ मध्ये पराभव ...
नियमांमध्ये करण्यात आलेले बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवण्यात येतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने बदलांना मंजुरी दिलेली आहे. लवकरच एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल. १९ वर्षांखालील विश्वचषक टी-२० स्पर्धा, ५० षटकांचे सामने हायब्रिड स्वरुपात खेळवायचे की नाही, याचा निर्णय हा गट घेईल. सिंगापूरमध्ये १७ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनापूर्वी कार्यकारी गट स्थापन होण्याची
शक्यता आहे.