समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन

मुंबई : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे गुरुवार ५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा इगतपुरी येथे होणार आहे. अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाद्वारे संपूर्ण समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.


समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील रस्ते मार्गाचे अंतर १६ तासांवरुन आठ तासांवर येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीच नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी. रस्ता बांधला आहे. या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. टप्पा सध्या सेवेत आहे. आता गुरुवार ५ जून रोजी इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.


काय आहे समृद्धी महामार्ग ?


नागपूर ते मुंबई हा ७०१ किमी. लांबीचा समृद्धी महामार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जातो. हा सहा मार्गिका असलेला १२० मीटर रुंदीचा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराशी जोडतो. हा महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांना जोडतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ठाणे जिल्हा मार्गे मुंबईशी जोडण्याचे काम समृद्धी महामार्ग करतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग बांधून काढला आहे. सपाट जमिनीवरुन जात असताना या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने आणि सह्याद्री घाटात ताशी १०० किमी. वेगाने कार पळवणे या महामार्गावर शक्य आहे. समृद्धी महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर (जुने नाव - औरंगाबाद), जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांतून जातो.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल