समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन

मुंबई : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे गुरुवार ५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा इगतपुरी येथे होणार आहे. अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाद्वारे संपूर्ण समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.


समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील रस्ते मार्गाचे अंतर १६ तासांवरुन आठ तासांवर येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीच नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी. रस्ता बांधला आहे. या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. टप्पा सध्या सेवेत आहे. आता गुरुवार ५ जून रोजी इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.


काय आहे समृद्धी महामार्ग ?


नागपूर ते मुंबई हा ७०१ किमी. लांबीचा समृद्धी महामार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जातो. हा सहा मार्गिका असलेला १२० मीटर रुंदीचा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराशी जोडतो. हा महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांना जोडतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ठाणे जिल्हा मार्गे मुंबईशी जोडण्याचे काम समृद्धी महामार्ग करतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग बांधून काढला आहे. सपाट जमिनीवरुन जात असताना या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने आणि सह्याद्री घाटात ताशी १०० किमी. वेगाने कार पळवणे या महामार्गावर शक्य आहे. समृद्धी महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर (जुने नाव - औरंगाबाद), जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांतून जातो.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल