समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन

मुंबई : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे गुरुवार ५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा इगतपुरी येथे होणार आहे. अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाद्वारे संपूर्ण समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.


समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील रस्ते मार्गाचे अंतर १६ तासांवरुन आठ तासांवर येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीच नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी. रस्ता बांधला आहे. या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. टप्पा सध्या सेवेत आहे. आता गुरुवार ५ जून रोजी इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.


काय आहे समृद्धी महामार्ग ?


नागपूर ते मुंबई हा ७०१ किमी. लांबीचा समृद्धी महामार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जातो. हा सहा मार्गिका असलेला १२० मीटर रुंदीचा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराशी जोडतो. हा महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांना जोडतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ठाणे जिल्हा मार्गे मुंबईशी जोडण्याचे काम समृद्धी महामार्ग करतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग बांधून काढला आहे. सपाट जमिनीवरुन जात असताना या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने आणि सह्याद्री घाटात ताशी १०० किमी. वेगाने कार पळवणे या महामार्गावर शक्य आहे. समृद्धी महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर (जुने नाव - औरंगाबाद), जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांतून जातो.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका