ऐतिहासिक : NDA मधून एकाचवेळी १७ मुली सैन्यात दाखल

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये शुक्रवारी इतिहास घडला. अधिकारी म्हणून सैन्यदलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला बॅचच्या सतरा कॅडेट्स एनडीएतून खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. या काळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेक शारीरिक, मानसिक आव्हानांना सामोरे गेल्या. एनडीएतील हा दीक्षांत समारंभ म्हणजे अवघ्या भारतासाठी हा क्षण अभिमानाचा होता. विशेष म्हणजे ७५ वर्षांचा इतिहासात प्रथमच मुला- मुलींचे दीक्षांत संचलन एकत्रित पार पडले.



सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या निकालानंतर मुलींसाठी एनडीएचे दरवाजे पंचाहत्तर वर्षांनी प्रथमच खुले झाले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवत देशभरातून १९ मुलींची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. यातील १७ कॅडेट्सनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण ३३९ कॅडेट पदवी घेऊन लष्कर, नौदल आणि हवाईदलात थेट अधिकारीपदावर नियुक्त होणार आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने गुरुवारी पदवी प्रदान केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुण्यातील एनडीएच्या मैदानावर मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. सिंग यांच्या उपस्थित १४८ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. ऐतिहासिक पासिंग आउट परेडमध्ये मुली व मुलांनी पथसंचलन केले. मुलांच्या बरोबरीने या मुलींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या परेडमध्येही मुलांच्या इतकाच जोश, ताकद अन् उत्साह मुलींमध्ये दिसला. हा प्रसंग अनुभवताना मुलींच्या आई-वडिलांसह प्रत्येकांचा उर देशाभिमाने भरून आला. मुलींच्या पहिल्या तुकडीचा कॅडेट असल्याचा अभिमान वाटतो,. आई - वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना मुलींनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ, एनडीएचे प्रमुख व्हाॅइस अ‍ॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी तयार करता यावेत या उद्देशानं एनडीएची स्थापना पुण्यातील खडकवासला इथं 8 जून 1949 ला झाली. त्यानंतर त्यानंतर ७५ वर्षांनंतर सर्व मुली तीन वर्षांचे खडतर परिश्रम पूर्ण करीत आज देशाच्या सैन्यदलात अधिकारीपदावर रुजू होण्यास सज्ज झाल्या. एनडीएमध्ये प्रवेश मिळवण्यापासून ते येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण . या आव्हानांना सामोरे जात सगळ्या जणींनी यशाला गवसणी घातलीय. यशाने पुढे जाण्याचा नवा आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही सर्व जणींनी तीन वर्षे एकत्रित प्रशिक्षण घेतले. आम्ही सर्व जणींनी एकमेकांना प्रोत्साहित केले. आम्ही सगळ्या जणी बहिणी आहोत. प्रत्येकीने यशाचे शिखर गाठल्याचा आनंद आहे. मी पुढे नौदलात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया हरसिमरन कौर हिनं व्यक्त केली.
Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील