मुसळधारांमुळे देहरंग धरण ‘तुडुंब’

पनवेलकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला


पनवेल : पनवेल शहराची तहान भागविणाऱ्या देहरंग धरण क्षेत्रात मुसळधारांमुळे धरण तुडुंब भरले आणि पनवेलकरांचा पाणीप्रश्न मिटला. पनवेलकर मार्च महिन्यापासून आठवड्याला एक दिवसाच्या पाणीकपातीचा सामना करत आहे. ही पाणीकपात जून महिन्यापर्यंत सुरू राहणार होती. मात्र धरण तुडुंब झाल्याने सोमवारपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पनवेल महापालिका आयुक्तांनी घेऊन पनवेलकरांना दिलासा दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडल्यामुळे धरण मे महिन्यातर आकंठ भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.



दरवर्षी मोसमाच्या पावसानंतर जून अखेरपर्यंत देहरंग धरण तुडुंब भरुन वाहू लागते. या धरणाची क्षमता ३.१२५ घन लक्ष मीटर आहे. या धरणातून पनवेल शहराला दररोज १६ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी ३२ दश लक्ष लीटर पाण्याची गरज आहे.


महापालिका प्रशासन देहरंग व्यतिरिक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून उसनवारीने पाणी घेऊन शहराची तहान भागवते. मुसळधारांमुळे एका दिवसात २९६ मिलीमीटर पाऊस पनवेल परिसरामध्ये पडल्याने धरण तुडुंब भरुन वाहू लागले.


देहरंग धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पनवेल शहरासाठी घेता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून दिवसाला ४ ते ५ दश लक्ष लीटर पाणी घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या नियोजनामुळे मार्च महिन्यापासून पाणी कपात लागू केल्यामुळे एमजेपीकडून वाढीव पाणी पुरवठा पनवेल शहराला केला जात होता. मुसळधार धरण क्षेत्रात कोसळल्यामुळे हा पाऊस पनवेलकरांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित