कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरू, दादर - प्रभादेवीहून नरिमन पॉइंटला झटपट जाता येणार

मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारी रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आता कोस्टल रोडचा भुयारी मार्ग चारचाकी वाहने आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला झाला आहे. भुयारी मार्गात दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश नाही. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमीचा कोस्टल रोड अर्थात किनारी रस्ता प्रवासासाठी उपलब्ध आहे. यामुळे दादर - प्रभादेवी पट्ट्यातून नरिमन पॉइंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहतूक वेगवान होणार आहे. हा मार्ग सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवासाकरिता उपलब्ध असेल.

भुयारी मार्ग जे. के. कपूर चौक ते कोस्टल रोड, तसेच सागरी सेतूला (सी लिंक) जोडला गेला आहे. त्यामुळे खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरुन सी लिंकला जाणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. भुयारी मार्गातून दोन मार्ग निघतात. त्यातील एक मार्ग हा कोस्टल रोडकडे जाणारा तर दुसरा मार्ग हा वरळी सी लिंककडे जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.
Comments
Add Comment

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच