माणेरे गावातील दोन बोगस डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कारवाई


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दोन बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी अशी त्यांची नावे आहेत. माणेरे येथील या दोन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी लागल्याने केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे.



माणेरे गावातील साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकाने धाड टाकली. यावेळी श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. तपासात असे निष्पन्न झाले की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी ही अर्हता असून, ती पद्धत शासनमान्य नसल्यामुळे अशा अर्हताधारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही. या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी यांनी दिलेल्या तक्रीरीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ मधील कलम ३१८ व ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.


केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरांविरोधात १९ मे२०२५ रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला असून याप्रकरणी पुनश्च व्हिजिट, मेडिकल काँन्सिलकडे कागदपत्र तपासणी यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास सव्वा वर्षाचा विलंब झाला”, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या