माणेरे गावातील दोन बोगस डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कारवाई


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दोन बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी अशी त्यांची नावे आहेत. माणेरे येथील या दोन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी लागल्याने केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे.



माणेरे गावातील साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकाने धाड टाकली. यावेळी श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. तपासात असे निष्पन्न झाले की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी ही अर्हता असून, ती पद्धत शासनमान्य नसल्यामुळे अशा अर्हताधारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही. या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी यांनी दिलेल्या तक्रीरीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ मधील कलम ३१८ व ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.


केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरांविरोधात १९ मे२०२५ रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला असून याप्रकरणी पुनश्च व्हिजिट, मेडिकल काँन्सिलकडे कागदपत्र तपासणी यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास सव्वा वर्षाचा विलंब झाला”, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये