माणेरे गावातील दोन बोगस डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल

  37

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कारवाई


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दोन बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी अशी त्यांची नावे आहेत. माणेरे येथील या दोन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी लागल्याने केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे.



माणेरे गावातील साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकाने धाड टाकली. यावेळी श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. तपासात असे निष्पन्न झाले की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी ही अर्हता असून, ती पद्धत शासनमान्य नसल्यामुळे अशा अर्हताधारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही. या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी यांनी दिलेल्या तक्रीरीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ मधील कलम ३१८ व ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.


केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरांविरोधात १९ मे२०२५ रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला असून याप्रकरणी पुनश्च व्हिजिट, मेडिकल काँन्सिलकडे कागदपत्र तपासणी यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास सव्वा वर्षाचा विलंब झाला”, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध