लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार : गोपीचंद पडळकर

जामखेड : "लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा", अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.


गोपीचंद पडळकर म्हणाले, लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांत बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.


लव्ह जिहादच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत उघडकीस आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे.गोपीचंद पडळकर ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मी आज काहीही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत.



पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली. आम्ही कायम आंदोलन करत होतो पण कोणी दखल घेत नव्हते.


देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ एका वर्षात या सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. १७७० मध्ये अहिल्यादेवी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर मोदीजींनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी १० हेलपाटे घातले पण निधी लवकर मिळाला नाही.


पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात ७०० कोटी रुपयांचा निधी चोंडीसाठी दिला. अहिल्यादेवी यांना ३०० वर्षानंतर न्याय मिळाला.

Comments
Add Comment

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात

NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला