लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार : गोपीचंद पडळकर

जामखेड : "लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा", अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.


गोपीचंद पडळकर म्हणाले, लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांत बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.


लव्ह जिहादच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत उघडकीस आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे.गोपीचंद पडळकर ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मी आज काहीही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत.



पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली. आम्ही कायम आंदोलन करत होतो पण कोणी दखल घेत नव्हते.


देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ एका वर्षात या सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. १७७० मध्ये अहिल्यादेवी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर मोदीजींनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी १० हेलपाटे घातले पण निधी लवकर मिळाला नाही.


पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात ७०० कोटी रुपयांचा निधी चोंडीसाठी दिला. अहिल्यादेवी यांना ३०० वर्षानंतर न्याय मिळाला.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत