महापेतील डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचल्याने थांबली गाळ वाहतूक

नवीन डम्पिंग ग्राऊंड म्हणून मुंब्रा येथे शोधली जागा


मुंबई : पावसामुळे आधीच नदीतील काढून ठेवलेला गाळ पाण्यात वाहून गेला, त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने गाळ उचलण्यात होणारा विलंब लक्षात घेता अखेर मिठी नदीतील काढलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ हा महापे येथील डम्पिंग ग्राऊंड ऐवजी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असून गुरुवारी रात्रीपासूनच हा गाळ उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेच्या वतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. या तीन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे.

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखेर मिठी नदीतील सर्व कंत्राटदारांनी अखेर नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेतला आहे. त्यासाठी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. याठिकाणी गुरुवापासून पुन्हा गाळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उचलण्याच्या कामाला शिथिलता आली होती, ते काम पुन्हा सुरु झाल्याने मिठी नदीच्या सफाई कामाला पुन्हा गती प्राप्त झाली.
Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री