महापेतील डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचल्याने थांबली गाळ वाहतूक

नवीन डम्पिंग ग्राऊंड म्हणून मुंब्रा येथे शोधली जागा


मुंबई : पावसामुळे आधीच नदीतील काढून ठेवलेला गाळ पाण्यात वाहून गेला, त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने गाळ उचलण्यात होणारा विलंब लक्षात घेता अखेर मिठी नदीतील काढलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ हा महापे येथील डम्पिंग ग्राऊंड ऐवजी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असून गुरुवारी रात्रीपासूनच हा गाळ उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेच्या वतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. या तीन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे.

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखेर मिठी नदीतील सर्व कंत्राटदारांनी अखेर नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेतला आहे. त्यासाठी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. याठिकाणी गुरुवापासून पुन्हा गाळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उचलण्याच्या कामाला शिथिलता आली होती, ते काम पुन्हा सुरु झाल्याने मिठी नदीच्या सफाई कामाला पुन्हा गती प्राप्त झाली.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून