महापेतील डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचल्याने थांबली गाळ वाहतूक

नवीन डम्पिंग ग्राऊंड म्हणून मुंब्रा येथे शोधली जागा


मुंबई : पावसामुळे आधीच नदीतील काढून ठेवलेला गाळ पाण्यात वाहून गेला, त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने गाळ उचलण्यात होणारा विलंब लक्षात घेता अखेर मिठी नदीतील काढलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ हा महापे येथील डम्पिंग ग्राऊंड ऐवजी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असून गुरुवारी रात्रीपासूनच हा गाळ उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेच्या वतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. या तीन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे.

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखेर मिठी नदीतील सर्व कंत्राटदारांनी अखेर नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेतला आहे. त्यासाठी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. याठिकाणी गुरुवापासून पुन्हा गाळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उचलण्याच्या कामाला शिथिलता आली होती, ते काम पुन्हा सुरु झाल्याने मिठी नदीच्या सफाई कामाला पुन्हा गती प्राप्त झाली.
Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून