आय प्रभागात रखडलेले रस्ता रुंदीकरण, गटारीचे काम सुरू

अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक सज्ज


कल्याण :कल्याण- डोंबिवली नगरपालिकेच्या आय प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम अखेर सुरू करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने या कामास सुरुवात केली.


दरम्यान, या िठकाणी असलेल्या गटारांमुळे येथे पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे अनेक िठकाणी पाणी साचून येथील इमारतींनाही या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही कामे लवकर सुरु झाल्याने येथील रहिवाशांना नक्कीच िदलासा मिळाला आहे. कामाला सुरुवात करताना माणेरे गावातील काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्याचबरोबर संबंधित भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तसेच मागील कृष्णानगरी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून महापालिकेने तत्काळ ११ गाळेधारकांवर निष्कासन कारवाई केली. यामध्ये अनधिकृत शेड, ओटे आणि अडथळा निर्माण करणारे साहित्य काढून टाकण्यात आले. त्यानंतर वादग्रस्त ठिकाणी जुनी गटार व्यवस्था शोधून काढण्यात आली.


कारण या गटारांचे पाणी कृष्णा नदीत सोडले जात होते. त्यामुळे याचा एक वेगळा परिणाम येथील रहिवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे ही जुनी गटार व्यवस्था मुख्य नाल्याशी मार्किंगनुसार जोडण्यात आली. निष्कासन कारवाईनंतर रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात रेडियम पट्ट्या व 'डेंजर' अशी चिन्हे लावण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेली अनेक महिने रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले असून, लवकरच परिसरातील नागरिकांना सुधारित रस्ता आणि सांडपाणी निचरा सुविधांचा लाभ
मिळणार आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये