आय प्रभागात रखडलेले रस्ता रुंदीकरण, गटारीचे काम सुरू

  23

अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक सज्ज


कल्याण :कल्याण- डोंबिवली नगरपालिकेच्या आय प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम अखेर सुरू करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने या कामास सुरुवात केली.


दरम्यान, या िठकाणी असलेल्या गटारांमुळे येथे पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे अनेक िठकाणी पाणी साचून येथील इमारतींनाही या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही कामे लवकर सुरु झाल्याने येथील रहिवाशांना नक्कीच िदलासा मिळाला आहे. कामाला सुरुवात करताना माणेरे गावातील काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्याचबरोबर संबंधित भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तसेच मागील कृष्णानगरी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून महापालिकेने तत्काळ ११ गाळेधारकांवर निष्कासन कारवाई केली. यामध्ये अनधिकृत शेड, ओटे आणि अडथळा निर्माण करणारे साहित्य काढून टाकण्यात आले. त्यानंतर वादग्रस्त ठिकाणी जुनी गटार व्यवस्था शोधून काढण्यात आली.


कारण या गटारांचे पाणी कृष्णा नदीत सोडले जात होते. त्यामुळे याचा एक वेगळा परिणाम येथील रहिवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे ही जुनी गटार व्यवस्था मुख्य नाल्याशी मार्किंगनुसार जोडण्यात आली. निष्कासन कारवाईनंतर रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात रेडियम पट्ट्या व 'डेंजर' अशी चिन्हे लावण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेली अनेक महिने रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले असून, लवकरच परिसरातील नागरिकांना सुधारित रस्ता आणि सांडपाणी निचरा सुविधांचा लाभ
मिळणार आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या