गुजरात टायटन्सचा राशिद खान IPL 2025 मधील सर्वाधिक महागडा आणि अयशस्वी गोलंदाज

चंदिगड : गुजरात टायटन्सचा राशिद खान आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक महागडा आणि अयशस्वी गोलंदाज ठरला. आयपीएल २०२५ साठी गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपये मोजून रिटेन केले होते. पण राशिदने आयपीएल २०२५ मध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही.

राशिद खानने आयपीएल २०२५ मध्ये १५ सामन्यांत ५५ षटके टाकली, ५७.११ च्या सरासरीने ५१४ धावा देत फक्त नऊ बळी घेतले. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांनी राशिदच्या गोलंदाजीवर ३३ षटकार मारले.

एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईचा २० धावांनी विजय झाला आणि गुजरातचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले. चंदिगडमध्ये झालेल्या एलिमिनेटरमध्ये राशिदने चार षटकांत ३१ धावा दिल्या. या महत्त्वाच्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवणे जमले नाही.यंदाच्या आयपीएलमधील राशिदचे हे अपयश गुजरात टायटन्सला भोवले. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आयपीएलच्या आधीच्या हंगामात प्रभावी ठरला होता. यामुळेच गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपये मोजून रिटेन केले होते. पण यावेळी राशिद अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
Comments
Add Comment

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ

हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

T20 World Cup 2026 Ind vs SA : आपण पॉवरप्लेमध्येच सामना गमावला - सूर्यकुमार यादव

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ४३ वा सामना अहमदाबाद येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना