नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या : रामदास चारोस्कर

दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वादळी वार्‍यासह सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कांदा, भाजीपाला, आंब, टोमॅटो तसेच बेदाणा शेड, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी केली. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.


दिंडोरी व पेठ तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले. त्याचप्रमाणे घराांसह गोदामावरील पत्रे उडाले, आंबा, कांदा, भोपळा, दोडका, कारले, आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बेदाणा शेड, शेडनेट, मचिंग पेपर हे हवेने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्‍याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्यामुळे लाखो नुकसान झाले आहे. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


एकीकडे बँक, सोसायटीचे कर्जाची रक्कम उभी कशी करायची? अशी विवंचना असतानाच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचेे जगणे असह्य केले आहे. तसेच ठराविक कालावधीनंतर पावसाच्या हजेरीमुळे शेती व्यवसायाची पुरती वाट लागली आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून शेतीपिकांची पाहणी केली. यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नको! मंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका

नाशिक: ज्वलंत हिंदुत्वाचे राज्यातले केंद्र नाशिकमध्ये आहे. या नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर

नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती

नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात

बुरखा घालून १४ वेळा मतदान करण्याला आक्षेप नाही ?

मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल नाशिक  : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा