नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या : रामदास चारोस्कर

दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वादळी वार्‍यासह सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कांदा, भाजीपाला, आंब, टोमॅटो तसेच बेदाणा शेड, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी केली. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.


दिंडोरी व पेठ तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले. त्याचप्रमाणे घराांसह गोदामावरील पत्रे उडाले, आंबा, कांदा, भोपळा, दोडका, कारले, आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बेदाणा शेड, शेडनेट, मचिंग पेपर हे हवेने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्‍याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्यामुळे लाखो नुकसान झाले आहे. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


एकीकडे बँक, सोसायटीचे कर्जाची रक्कम उभी कशी करायची? अशी विवंचना असतानाच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचेे जगणे असह्य केले आहे. तसेच ठराविक कालावधीनंतर पावसाच्या हजेरीमुळे शेती व्यवसायाची पुरती वाट लागली आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून शेतीपिकांची पाहणी केली. यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

Nashik News : सावधान! ५-१० रुपयांची कुल्फी पडेल महागात! नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.