भारतात २०२४ - २५ मध्ये ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली : भारतात वेगाने विकास होत आहे. देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. सरकारने गुंतवणूकस्नेही धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतातील अनेक क्षेत्र आता १०० टक्के परदेशी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांचा फायदा होत आहे. भारतात २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

देशात २०१३ - १४ मध्ये ३६.०५ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती. तिथून भारताने प्रगती करत २०२३ - २४ मध्ये ७१.२८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळवली. यानंतर २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात भारतात ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

देशात २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात झालेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. त्याखालोखाल १६ टक्के गुंतवणूक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात झाली. इतर व्यापारात आठ टक्के गुंतवणूक झाली. सेवा क्षेत्रातील गेल्या वर्षाच्या ६.६४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीत ४०.७७ टक्क्यांनी वाढ झाली. सेवा क्षेत्रात यंदा ९.३५ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. याआधी २०२३ - २४ मध्ये सेवा क्षेत्रात १६.१२ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती.

आर्थिक वर्ष २०२४ - २५ मध्ये देशात सर्वाधिक ३९ टक्के थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. कर्नाटकमध्ये १३ टक्के, दिल्लीत १२ टक्के थेट परदेशी गुंतवणूक झाली. गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूरमधून सर्वात जास्त ३० टक्के, मॉरिशसमधून १७ टक्के, अमेरिकेतून ११ टक्के थेट गुंतवणूक भारतात झाली.

मागील अकरा वर्षात (२०१४ ते २०२५) देशात ७४८.७८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. याआधीच्या अकरा वर्षांत (२००२३ ते २०१४) देशात ३०३.३८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. देशामध्ये २००२३ ते २०१४ च्या तुलनेत २०१४ ते २०२५ या कालावधीत १४३ टक्के जास्त अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

मागील २५ वर्षात देशात १०७२.३६ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. यापैकी ७० टक्के थेट परदेशी गुंतवणूक २०१४ ते २०२५ दरम्यान देशत झाली आहे. भारतात थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांची संख्या २०१३ - १४ मध्ये ८९ होती ही संख्या २०२४ - २५ मध्ये ११२ झाली आहे.
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात