आदिवासी समुदायांना सामूहिक वन हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी प्रयत्नांची गरज : चैत्राम पवार

  50

नाशिक :आदिवासी समुदायांना सामुहिक वन हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी प्रयत्नांची गरज असुन "जल, जंगल, जमीन, जन, आणि जनावर" या पंचसूत्रीच्या वापराने आदिवासी समुदायाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन पद्मश्री श्री चैत्राम पवार यांनी केले आहे.ते एन.जी.ओ. फोरम नाशिक च्या वतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते श्री चैत्राम पवार रा.बारी पाडा ता.साक्री जि.धुळे यांना आदिवासी भागात "जल, जंगल, जमीन, जन, आणि जनावर" या पंचसूत्री वर आधारित कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून आदिवासी समाजाचा विकास घडवून आणल्याबद्दल भारत सरकार ने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल एन.जी.ओ.फोरम नाशिक च्या वतीने अध्यक्ष श्री.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार व सचिव राजाभाऊ शिरसाठ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार समारंभ हुतात्मा स्मारक,नाशिक येथे पार पडला.


सोबतच विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रामुख्याने श्रावण देवरे-आदिवासी सेवक पुरस्कार,निशिकांत पगारे- भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड,शोभा काळे - विधवा व दिव्यांगांचे पुनर्वसन,महेंद्र मुळे -एच.आय. व्ही बाधितांचे पुनर्वसन, यशवंत लकडे - बेघर- निराश्रितांसाठी मोफत निवारा, रामदास नागवंशी - पत्रकारिता यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी निशिकांत पगारे, अरविंद क्षीरसागर, भगवान भगत, डॉ.प्रभाकर वडजे, नितीन सोनवणे, संपादक रामदास नागवंशी, महेंद्र मुळे, श्रावण देवरे, शोभा काळे, योगेश बर्वे,यशवंत लकडे आदी नाशिक जिल्ह्यातील सामाजिक संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून