नाशिक जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी जाणार संपावर : बोराडे

  23

पिंपळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा उभारण्यासाठी नाशिक येथे भव्य कर्जमुक्ती मेळावा रविवारी (ता 1जून) दूपारी एक वाजता अनंत कान्हेरे मैदाना शेजारी कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर होणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात १ जून २०२३ पासून सिव्हिल हॉस्पिटल च्या समोर दोन वर्षापासून धरणे आंदोलन सुरू आहे.

या धरणे आंदोलनाला आता १ जून २०२५ ला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्त येत्या १ जून २०२५ रोजी शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती मेळावा नाशिक येथे अनंत कन्हेरे मैदान येथे घेण्यात आला आहे. या कर्जमुक्ती मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी छत्रपती संभाजी राजे भोसले , आणि अर्थतज्ञ विजय जावंदिया हे असणार आहे तसेच प्रमुख उपस्थिती वारकरी सांप्रदायाचे आचार्य रामकृष्ण दासजी महाराज लहवितकर नाशिक, सामाजिक व राजकीय संघर्ष करणारे शांतिगिरी महाराज नाशिक शेतकऱ्यांचे संघर्ष योद्धे अनिल गोटे ज्येष्ठ साहित्यिक धनंजय पाटील काकडे अमरावती शेतकरी झुंजार नेते माननीय श्री लक्ष्मण वडले जालना शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल राजे पवार सीता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब देशमुख, यवतमाळ, हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी नेते आणि सांप्रदायातील महंत उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्जमुक्ती आंदोलनाचे सेनापती भगवान बोराडे, आदिवासी नेते कैलास बोरसे, समन्वय समिती सदस्य श्री दिलीप पाटील , शेतकरी नेते सुधाकर मोगल निफाड, शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव आयोजक संघटना शेतकरी संघटना समन्वय समिती, आदिवासी संघर्ष समिती, व नाशिक जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजकांनी केले आहे.

Comments
Add Comment

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा