पश्चिम रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक, १६२ लोकल रद्द

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून म्हणजेच शनिवार ३१ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजल्यापासून सोमवार २ जून रोजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत असा ३६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या आणि यार्ड मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कांदिवली पश्चिमेलगतचे उन्नत तिकीट आरक्षण केंद्र पाडण्यात येणार आहे. पर्यायी सात खिडक्यांचे नवे केंद्र खुले करण्यात आले आहे.

ब्लॉक असल्यामुळे शनिवारी दुपारनंतर ७३ आणि रविवारी दिवसभरात ८९ अशा एकूण १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवस काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. विशेष ब्लॉक असल्यामुळे ३१ मे रोजी धावणारी गाडी क्र.१९४१८ अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. १ जून रोजी (१९४१७) बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस वसईहूनच रवाना होईल. ३१ मे आणि १ जून रोजी (१९४२५) बोरिवली-नंदुरबार भाईंदर स्थानकावरून धावेल. ३१ मे रोजीची (१९४२६) नंदूरबार-बोरिवली वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. एकूण चार एक्स्प्रेस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि 'सीएसएमटी' ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक
ब्लॉक काळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकल फेऱ्या घाटकोपरवरून पुन्हा जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक
सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल रद्द. हार्बरवरील प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
Comments
Add Comment

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि