पश्चिम रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक, १६२ लोकल रद्द

  33

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून म्हणजेच शनिवार ३१ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजल्यापासून सोमवार २ जून रोजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत असा ३६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या आणि यार्ड मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कांदिवली पश्चिमेलगतचे उन्नत तिकीट आरक्षण केंद्र पाडण्यात येणार आहे. पर्यायी सात खिडक्यांचे नवे केंद्र खुले करण्यात आले आहे.

ब्लॉक असल्यामुळे शनिवारी दुपारनंतर ७३ आणि रविवारी दिवसभरात ८९ अशा एकूण १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवस काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. विशेष ब्लॉक असल्यामुळे ३१ मे रोजी धावणारी गाडी क्र.१९४१८ अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. १ जून रोजी (१९४१७) बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस वसईहूनच रवाना होईल. ३१ मे आणि १ जून रोजी (१९४२५) बोरिवली-नंदुरबार भाईंदर स्थानकावरून धावेल. ३१ मे रोजीची (१९४२६) नंदूरबार-बोरिवली वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. एकूण चार एक्स्प्रेस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि 'सीएसएमटी' ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक
ब्लॉक काळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकल फेऱ्या घाटकोपरवरून पुन्हा जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक
सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल रद्द. हार्बरवरील प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
Comments
Add Comment

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी

"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार

"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम

रमाबाई नगरातील रहिवासी शौचालये, पाण्यापासून वंचित

तोडलेल्या शौचालयांचे काम कुर्म गतीने मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगरातील तसेच बाजूच्या

अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

मागील सहा महिन्यांपासून पारंपरिक दाहिनीची सेवा आहे बंद मुंबई : अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी मागील