बकरी ईदसाठी अनधिकृत कत्तल रोखणार

महापालिकेची तीन भरारी पथके तैनात


मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद सणाच्या निमित्ताने धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा माय बीएसी अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बकऱ्यांचा अधिकृत वध करण्यासाठी देवनार पशुवधगृहाची सुविधा असूनही अनेक मुस्लिम बांधवांकडून अनधिकृतपणे कत्तल केली जाते. त्यामुळे अशाप्रकारे होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलींचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र भरारी पथके तयार करण्यात आली आहे.



महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत दिनांक ७ ते ९ जून २०२५ दरम्यान मुंबईत एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज करताना संबंधित जागा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा खासगी मालकीची असल्यास त्यासंबंधीत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच अर्जदाराचे ओळखपत्र अर्ज करताना अपलोड करावे लागेल. किती पशुंचे आणि कोणत्या दिवशी धार्मिक पशुवध करावयाचे आहे, याचा उल्लेख अर्ज करताना करावा लागेल.


महापालिकेच्यावतीने सर्व प्रकारची व्यवस्था आणि सुविधा देवनार पशुवधगृहांमध्ये उपलब्ध करून दिल्यानंतरही अनधिकृतपणे बकऱ्यांची बळी दिला जात आहे. महापालिकेने यासाठीची दिलेल्या सुविधेमध्ये बकऱ्यांची आरोग्य चाचणी करून ते कापण्यास परवानगी दिली जाते. तर अनधिकृतपणे बकरे कापताना त्याची आरोग्यदृष्टी कोनातून चाचणी होत नाही. त्यामुळे रोगी बकरा कापला जावून त्याच्या कत्तलीमध्ये आसपासच्या परिसरात दुर्गंध आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे अशाप्रकारच्या अनधिकृत कत्तलीसाठी महापालिकेच्या बाजार विभागाच्यावतीने शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी २४ तास तपासणी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले. या पथकाकडे तक्रारी आल्यानंतर धाडी घालून त्यांच्याकडे वध करण्यासाठीची परवानगी आहे का याची तपासणी केली जाईल. तसेच जर नसेल तर बकरे जप्त केले जातील आणि तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असल्याचे बाजार विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा