पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक नेत्यांचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर रियाध, जाकार्ता, सौदी अरेबिया, इटली, इंडोनेशिया या सर्व देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे.


पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात आपण भारताबरोबर असल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले.इटलीने द्विपक्षीय सहकार्य देऊ केले तर भारताला दहशतवादाविरोधातील शक्य त्या सर्व व्यासपीठांवर आपला पाठिंबा असल्याचे इंडोनेशियाने सांगितले.तर दहशतवादाविरोधात 'शून्य सहिष्णूते'ची भूमिका घेण्याच्या भारताच्या धोरणाची दक्षिण आफ्रिकेने प्रशंसा केली. फ्रान्सनेही या मुद्द्यावर आपण भारताबरोबर असल्याचे स्पष्टपणे सांगितले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या जनतेचे दहशतवादाविरोधात संरक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराला विविध देशांनी पाठिंबा दिला आहे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.


'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांचा दौरा करत आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २२ एप्रिलला केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कोणत्या परिस्थितीत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली हे जागतिक नेत्यांना पटवून देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.


त्याअंतर्गत ३३ देशांच्या राजधान्यांनाही भेट दिली जात आहे. सौदी अरेबिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फ्रान्स, पनामा या देशांमधील भारतीय दूतावासाने विविध भेटींची एक्सवरून माहिती दिली.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या