पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक नेत्यांचा भारताला पाठिंबा

  22

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर रियाध, जाकार्ता, सौदी अरेबिया, इटली, इंडोनेशिया या सर्व देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे.


पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात आपण भारताबरोबर असल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले.इटलीने द्विपक्षीय सहकार्य देऊ केले तर भारताला दहशतवादाविरोधातील शक्य त्या सर्व व्यासपीठांवर आपला पाठिंबा असल्याचे इंडोनेशियाने सांगितले.तर दहशतवादाविरोधात 'शून्य सहिष्णूते'ची भूमिका घेण्याच्या भारताच्या धोरणाची दक्षिण आफ्रिकेने प्रशंसा केली. फ्रान्सनेही या मुद्द्यावर आपण भारताबरोबर असल्याचे स्पष्टपणे सांगितले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या जनतेचे दहशतवादाविरोधात संरक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराला विविध देशांनी पाठिंबा दिला आहे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.


'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांचा दौरा करत आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २२ एप्रिलला केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कोणत्या परिस्थितीत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली हे जागतिक नेत्यांना पटवून देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.


त्याअंतर्गत ३३ देशांच्या राजधान्यांनाही भेट दिली जात आहे. सौदी अरेबिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फ्रान्स, पनामा या देशांमधील भारतीय दूतावासाने विविध भेटींची एक्सवरून माहिती दिली.

Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात