किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

मात्र धोका कायम; प्रशासनाकडून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


महाड: हिंदवी स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत घाटरस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गाववाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता मात्र संबंधित ठेकेदारामार्फत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करून केवळ १२ तासांत हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी आणि ६ व ९ जून रोजी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता धोका कायम असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाड ते किल्ले रायगडपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून मागील सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या मार्फत या मार्गाच्या निर्मितीसाठी होणारा विलंब व जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.


सोमवारी सकाळी कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्या जवळ रस्ता खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे २४ किमी च्या या महामार्गा दरम्यान अनेक मोऱ्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही दिवसांवर आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर पाहता घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याची भितीही वर्तवली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव