किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

मात्र धोका कायम; प्रशासनाकडून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


महाड: हिंदवी स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत घाटरस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गाववाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता मात्र संबंधित ठेकेदारामार्फत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करून केवळ १२ तासांत हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी आणि ६ व ९ जून रोजी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता धोका कायम असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाड ते किल्ले रायगडपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून मागील सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या मार्फत या मार्गाच्या निर्मितीसाठी होणारा विलंब व जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.


सोमवारी सकाळी कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्या जवळ रस्ता खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे २४ किमी च्या या महामार्गा दरम्यान अनेक मोऱ्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही दिवसांवर आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर पाहता घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याची भितीही वर्तवली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या