किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

  76

मात्र धोका कायम; प्रशासनाकडून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


महाड: हिंदवी स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत घाटरस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गाववाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता मात्र संबंधित ठेकेदारामार्फत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करून केवळ १२ तासांत हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी आणि ६ व ९ जून रोजी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता धोका कायम असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाड ते किल्ले रायगडपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून मागील सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या मार्फत या मार्गाच्या निर्मितीसाठी होणारा विलंब व जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.


सोमवारी सकाळी कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्या जवळ रस्ता खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे २४ किमी च्या या महामार्गा दरम्यान अनेक मोऱ्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही दिवसांवर आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर पाहता घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याची भितीही वर्तवली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक