किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

  54

मात्र धोका कायम; प्रशासनाकडून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


महाड: हिंदवी स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत घाटरस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गाववाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता मात्र संबंधित ठेकेदारामार्फत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करून केवळ १२ तासांत हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी आणि ६ व ९ जून रोजी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता धोका कायम असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाड ते किल्ले रायगडपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून मागील सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या मार्फत या मार्गाच्या निर्मितीसाठी होणारा विलंब व जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.


सोमवारी सकाळी कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्या जवळ रस्ता खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे २४ किमी च्या या महामार्गा दरम्यान अनेक मोऱ्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही दिवसांवर आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर पाहता घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याची भितीही वर्तवली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नागोठणे, वरवठणे पूल वाहतुकीसाठी बंद

अलिबाग : नागोठणे येथील मोघलकालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन

अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या

‘खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा’

पनवेल  : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात

पडसरे गावाला जोडणारा पूल मोजतोय अखेरची घटका

आश्रमशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटकांसह ग्रामस्थांचा जीव टांगणीला सुधागड-पाली : पावसाळी पर्यटनासाठी

जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी करतात काय?

महाड येथील आंबेत-टोळ पुलांचे भवितव्य धोक्यात, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष महाड : रायगड जिल्ह्यातील माजी