शहापूरकरांना मिळणार मुबलक स्वच्छ पाणी

पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटींच्या योजनेला हिरवा कंदील


शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने ४० कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. येत्या जून महिन्यात ह्या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या चर्चेत दिले. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाश्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शहापूर शहरप्रमुख विजय भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शहापूर नगरपंचायतीला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.



शहापूरला ग्रामपंचायत असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणी वाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती २०११ च्या जनगणनेनुसार तेव्हा ११ हजार लोकसंख्या होती ती लोकसंख्या आता २५ हजाराच्या आसपास गेली असल्याने सद्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. या योजनेला आता ४२ वर्षं झाली असून या योजनेतील पाईपलाईनला गळती व नादुरूस्ती यासारख्या अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकीकरण होत आहे. दरम्यान शहापूर शहरासाठी ४० कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०,१५ द.ल. लिटर पाणी मिळणार असल्याने येथील नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या बैठकीस नगर विकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव ई रवीचंद्रन, शहापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिडें, शहरप्रमुख उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेवक रणजीत भोईर, आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.