शहापूरकरांना मिळणार मुबलक स्वच्छ पाणी

पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटींच्या योजनेला हिरवा कंदील


शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने ४० कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. येत्या जून महिन्यात ह्या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या चर्चेत दिले. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाश्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शहापूर शहरप्रमुख विजय भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शहापूर नगरपंचायतीला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.



शहापूरला ग्रामपंचायत असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणी वाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती २०११ च्या जनगणनेनुसार तेव्हा ११ हजार लोकसंख्या होती ती लोकसंख्या आता २५ हजाराच्या आसपास गेली असल्याने सद्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. या योजनेला आता ४२ वर्षं झाली असून या योजनेतील पाईपलाईनला गळती व नादुरूस्ती यासारख्या अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकीकरण होत आहे. दरम्यान शहापूर शहरासाठी ४० कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०,१५ द.ल. लिटर पाणी मिळणार असल्याने येथील नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या बैठकीस नगर विकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव ई रवीचंद्रन, शहापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिडें, शहरप्रमुख उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेवक रणजीत भोईर, आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)