शहापूरकरांना मिळणार मुबलक स्वच्छ पाणी

पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटींच्या योजनेला हिरवा कंदील


शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने ४० कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. येत्या जून महिन्यात ह्या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या चर्चेत दिले. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाश्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शहापूर शहरप्रमुख विजय भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शहापूर नगरपंचायतीला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.



शहापूरला ग्रामपंचायत असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणी वाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती २०११ च्या जनगणनेनुसार तेव्हा ११ हजार लोकसंख्या होती ती लोकसंख्या आता २५ हजाराच्या आसपास गेली असल्याने सद्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. या योजनेला आता ४२ वर्षं झाली असून या योजनेतील पाईपलाईनला गळती व नादुरूस्ती यासारख्या अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकीकरण होत आहे. दरम्यान शहापूर शहरासाठी ४० कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०,१५ द.ल. लिटर पाणी मिळणार असल्याने येथील नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या बैठकीस नगर विकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव ई रवीचंद्रन, शहापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिडें, शहरप्रमुख उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेवक रणजीत भोईर, आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक