शहापूरकरांना मिळणार मुबलक स्वच्छ पाणी

पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटींच्या योजनेला हिरवा कंदील


शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने ४० कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. येत्या जून महिन्यात ह्या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या चर्चेत दिले. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाश्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शहापूर शहरप्रमुख विजय भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शहापूर नगरपंचायतीला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.



शहापूरला ग्रामपंचायत असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणी वाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती २०११ च्या जनगणनेनुसार तेव्हा ११ हजार लोकसंख्या होती ती लोकसंख्या आता २५ हजाराच्या आसपास गेली असल्याने सद्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. या योजनेला आता ४२ वर्षं झाली असून या योजनेतील पाईपलाईनला गळती व नादुरूस्ती यासारख्या अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकीकरण होत आहे. दरम्यान शहापूर शहरासाठी ४० कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०,१५ द.ल. लिटर पाणी मिळणार असल्याने येथील नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या बैठकीस नगर विकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव ई रवीचंद्रन, शहापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिडें, शहरप्रमुख उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेवक रणजीत भोईर, आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत