PM Modi: सापाला बिळातून बाहेर काढून चिरडू, मोदींचा दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल!

  66

रोहतास, बिहार : जर पुन्हा डोके वर काढले, तर सापासारखं बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना उद्देशून इशारा दिला आहे. रोहतास येथील सभेत बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला.


मोदी म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. मी जे वचन दिलं होतं, ते आमच्या संरक्षण दलांनी पूर्ण केलं आहे. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. भारताची दहशतवादाविरोधातली लढाई थांबणार नाही.”



त्यांच्या या भाषणात पाकिस्तानवरही जोरदार प्रहार केला. “पाकिस्तानचा इतिहास म्हणजे दहशतवाद आणि नरसंहार. तीन वेळा आम्ही घरात घुसून उत्तर दिलंय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ही १४० कोटी भारतीयांची गर्जना आहे,” असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांनाही लक्ष केलं. “जे लोक जंगलराज आणतात, गरीबांना सोडून देतात, ते आज सामाजिक न्यायाच्या नावाने गळा काढत आहेत. बिहारच्या जनतेने त्यांच्या खोट्या वचनांपासून सावध राहावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.


दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला इशारा देत सांगितलं, “यावेळी जर पाकिस्ताननं नापाक हरकत केली, तर कदाचित भारतीय नौदलही 'ओपनिंग' करेल.”


भारत पुन्हा कोणतीही कारवाई सहन करणार नाही. दहशतवाद्यांचा खात्मा हा केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रगौरवाचाही प्रश्न आहे, हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचं धोरण असल्याचं या भाषणातून ठळकपणे दिसून आलं.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय