PM Modi: सापाला बिळातून बाहेर काढून चिरडू, मोदींचा दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल!

रोहतास, बिहार : जर पुन्हा डोके वर काढले, तर सापासारखं बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना उद्देशून इशारा दिला आहे. रोहतास येथील सभेत बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला.


मोदी म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. मी जे वचन दिलं होतं, ते आमच्या संरक्षण दलांनी पूर्ण केलं आहे. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. भारताची दहशतवादाविरोधातली लढाई थांबणार नाही.”



त्यांच्या या भाषणात पाकिस्तानवरही जोरदार प्रहार केला. “पाकिस्तानचा इतिहास म्हणजे दहशतवाद आणि नरसंहार. तीन वेळा आम्ही घरात घुसून उत्तर दिलंय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ही १४० कोटी भारतीयांची गर्जना आहे,” असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांनाही लक्ष केलं. “जे लोक जंगलराज आणतात, गरीबांना सोडून देतात, ते आज सामाजिक न्यायाच्या नावाने गळा काढत आहेत. बिहारच्या जनतेने त्यांच्या खोट्या वचनांपासून सावध राहावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.


दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला इशारा देत सांगितलं, “यावेळी जर पाकिस्ताननं नापाक हरकत केली, तर कदाचित भारतीय नौदलही 'ओपनिंग' करेल.”


भारत पुन्हा कोणतीही कारवाई सहन करणार नाही. दहशतवाद्यांचा खात्मा हा केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रगौरवाचाही प्रश्न आहे, हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचं धोरण असल्याचं या भाषणातून ठळकपणे दिसून आलं.

Comments
Add Comment

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर