PM Modi: सापाला बिळातून बाहेर काढून चिरडू, मोदींचा दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल!

रोहतास, बिहार : जर पुन्हा डोके वर काढले, तर सापासारखं बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना उद्देशून इशारा दिला आहे. रोहतास येथील सभेत बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला.


मोदी म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. मी जे वचन दिलं होतं, ते आमच्या संरक्षण दलांनी पूर्ण केलं आहे. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. भारताची दहशतवादाविरोधातली लढाई थांबणार नाही.”



त्यांच्या या भाषणात पाकिस्तानवरही जोरदार प्रहार केला. “पाकिस्तानचा इतिहास म्हणजे दहशतवाद आणि नरसंहार. तीन वेळा आम्ही घरात घुसून उत्तर दिलंय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ही १४० कोटी भारतीयांची गर्जना आहे,” असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांनाही लक्ष केलं. “जे लोक जंगलराज आणतात, गरीबांना सोडून देतात, ते आज सामाजिक न्यायाच्या नावाने गळा काढत आहेत. बिहारच्या जनतेने त्यांच्या खोट्या वचनांपासून सावध राहावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.


दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला इशारा देत सांगितलं, “यावेळी जर पाकिस्ताननं नापाक हरकत केली, तर कदाचित भारतीय नौदलही 'ओपनिंग' करेल.”


भारत पुन्हा कोणतीही कारवाई सहन करणार नाही. दहशतवाद्यांचा खात्मा हा केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रगौरवाचाही प्रश्न आहे, हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचं धोरण असल्याचं या भाषणातून ठळकपणे दिसून आलं.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे