PM Modi: सापाला बिळातून बाहेर काढून चिरडू, मोदींचा दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल!

रोहतास, बिहार : जर पुन्हा डोके वर काढले, तर सापासारखं बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना उद्देशून इशारा दिला आहे. रोहतास येथील सभेत बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला.


मोदी म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. मी जे वचन दिलं होतं, ते आमच्या संरक्षण दलांनी पूर्ण केलं आहे. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. भारताची दहशतवादाविरोधातली लढाई थांबणार नाही.”



त्यांच्या या भाषणात पाकिस्तानवरही जोरदार प्रहार केला. “पाकिस्तानचा इतिहास म्हणजे दहशतवाद आणि नरसंहार. तीन वेळा आम्ही घरात घुसून उत्तर दिलंय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ही १४० कोटी भारतीयांची गर्जना आहे,” असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांनाही लक्ष केलं. “जे लोक जंगलराज आणतात, गरीबांना सोडून देतात, ते आज सामाजिक न्यायाच्या नावाने गळा काढत आहेत. बिहारच्या जनतेने त्यांच्या खोट्या वचनांपासून सावध राहावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.


दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला इशारा देत सांगितलं, “यावेळी जर पाकिस्ताननं नापाक हरकत केली, तर कदाचित भारतीय नौदलही 'ओपनिंग' करेल.”


भारत पुन्हा कोणतीही कारवाई सहन करणार नाही. दहशतवाद्यांचा खात्मा हा केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रगौरवाचाही प्रश्न आहे, हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचं धोरण असल्याचं या भाषणातून ठळकपणे दिसून आलं.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे