मंत्री नितेश राणेंनी घेतली वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

कुडाळ प्रतिनिधी : मंत्री नितेश राणेंनी कुडाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मंत्री नितेश राणेंनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. वीज वितरण कंपनीच्या नियंत्रण कक्षाच्या कामाची पद्धत समजून घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी काही सूचना दिल्या.

मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचा विजेचा पुरवठा अनेक तासांसाठी खंडीत झाला होता. या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. यानंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कुडाळमध्ये तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. कंपनीने नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर या कक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी कुडाळमध्ये कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कक्षाकडे किती तक्रारी आल्या आणि त्यातील किती सोडवल्या गेल्या तसेच कशा प्रकारे सोडवल्या गेल्या याची माहिती घेतली. यनंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.



कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे, आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच अनेक तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या असे मंत्री नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक