नामांतर झालेल्या स्थानकांची नावे, कोड बदला

खा. नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र


ठाणे  : महायुती सरकारने राज्यातील संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर या तीन ऐतिहासिक शहरांचे नामांतर केले आहे. मात्र अद्यापही रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची सूचना ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.


महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील तीन शहरांची नावे बदलली. त्यानुसार रेल्वे स्थानकांचे कोड, डिजिटल प्लॅटफॉर्म, रेल्वे अॅप्स आणि संबंधित सर्व प्रणालींमध्ये ही नवीन नावे देखील बदलण्याची गरज असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.



औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad स्टेशन कोड : AWB) नवीन नाव : संभाजीनगर (Sambhajinagar); उस्मानाबादचे (Osmanabad, स्टेशन कोड: UMD) नवीन नाव : धाराशिव (Dharashiv); अहमदनगरचे (Ahmednagar स्टेशन कोड : ANG) नवीन नाव : अहिल्यानगर (Ahilyanagar) या बदलांचा समावेश करण्यात यावा. रेल्वेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (उदा. IRCTC अॅप, वेबसाइट, तिकीट बुकिंग सिस्टम इत्यादी) ही नावे आणि कोड अजूनही जुन्याच स्वरूपात दिसत आहेत.


यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून नवीन नावांचा स्वीकार करण्यात अडचणी येत आहेत. तरी वरील नावे आणि त्यांचे स्टेशन कोड रेल्वेच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर तात्काळ अद्ययावत करण्याकरिता संबंधितांना द्याव्यात, यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा होईल तसेच राज्य सरकाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. मनसेचे कार्यकर्ते सुशांत डोंबे यांनीही अशा प्रकारची मागणी केली होती.

Comments
Add Comment

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके