अरे बापरे! सलग दोन महीने ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं; कोल्हापूरमध्ये पोलिसांनी केली सुटका

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोल्हापुर येथील राजारामपुरमध्ये ४० वर्षीय महिलेला तब्बल २ महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.  सदर महिला तिच्या भाच्याकडे राहत असून गेल्या दीड ते 2 महिन्यांपासून तिला बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला सलग दोन महीने साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलं आहे. सारिका साळी (40) असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची सुटका करण्यात आली आहे.



महिलेची मानसिक अवस्था खराब 


सारिका साळी या महिलेची मानसिक अवस्था चांगली नसून, रस्त्यावर फिरताना ती काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्यासमवेत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली  आहे. पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला सांखळदडांतून मुक्त केले आहे. या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर महिला तिच्या भाच्याकडे राहते. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून, याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करुन आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण