मान्सूनचा वेग मंदावला

मुंबई : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात मान्सूनने आगमन केलं. यंदा मान्सूनच्या आगमनासोबतच पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. मान्सून दाखल झाल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. यामुळे पाऊस ओसरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या २४ तासात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर राज्यातील उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आङे. यामुळे डीप डिप्रेशन सक्रीय झाले आहे. गुरुवारी हे डीप डिप्रेशन बांगलादेशमधील सागर बेटे आणि खेपूपारा इथं पोहोचले. याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यातल्या बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला आहे. पण अरबी समुद्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. गुरुवारी विदर्भासह छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग आणि पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झालाय. पूर्व भारतात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. तर महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकरण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.
Comments
Add Comment

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल