पालीत नागरिकांचे आरोग्य संकटात

  26

खोपोली महामार्गावर रासायनिक कचऱ्याचा खच


सुधागड-पाली : पाली-खोपोली महामार्गावरील दापोडे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एस्सार पेट्रोल पंपाच्या शेजारी हा कचरा खुलेआम फेकण्यात आला असून मुसळधार पावसामुळे तो पाण्यात मिसळत थेट आंबा नदीत पोहोचत आहे. हीच नदी पाली शहरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्याला धोका; नागरिकांची चिंता
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूषित पाणी पिल्याने त्वचेचे विकार, पचनतंत्राच्या समस्या, गंभीर आजार आणि कॅन्सर यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील शेती, जंगलातील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची उदासीनता ही कोणाची जबाबदारी?
प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रदूषण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला तपासणीसाठी पत्र पाठवल्याचे सांगितले, मात्र आत्तापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रासायनिक कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, रासायनिक कचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास प्रशासनाने संपूर्णतः जबाबदार राहिले पाहिजे. स्थानिकांनी या प्रश्नावर जागरूकता वाढवून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली पाहिजे.

Comments
Add Comment

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात

मुरुडच्या काशिद समुद्रकिनारी पंचावन्न लाखाेंचा चरस जप्त

नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील

एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार विजय मांडे कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध

पाली शहरात ३५ वर्षांनंतर अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’

अष्टविनायक तीर्थक्षेत्राला शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा अशी आहे जाहीर सूचना दिनांक ६/२/१९९० सालचे हे

रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या

वन-वे व्यवस्थेत बदल घडल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्यच; ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर

माथेरानमध्ये वीज, पाणी, वाहतूकही होते एकाच मार्गाने; स्थानिकांसह, पर्यटक, विद्यार्थ्यांचेही हाल माथेरान : १८५०