पालीत नागरिकांचे आरोग्य संकटात

खोपोली महामार्गावर रासायनिक कचऱ्याचा खच


सुधागड-पाली : पाली-खोपोली महामार्गावरील दापोडे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एस्सार पेट्रोल पंपाच्या शेजारी हा कचरा खुलेआम फेकण्यात आला असून मुसळधार पावसामुळे तो पाण्यात मिसळत थेट आंबा नदीत पोहोचत आहे. हीच नदी पाली शहरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्याला धोका; नागरिकांची चिंता
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूषित पाणी पिल्याने त्वचेचे विकार, पचनतंत्राच्या समस्या, गंभीर आजार आणि कॅन्सर यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील शेती, जंगलातील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची उदासीनता ही कोणाची जबाबदारी?
प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रदूषण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला तपासणीसाठी पत्र पाठवल्याचे सांगितले, मात्र आत्तापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रासायनिक कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, रासायनिक कचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास प्रशासनाने संपूर्णतः जबाबदार राहिले पाहिजे. स्थानिकांनी या प्रश्नावर जागरूकता वाढवून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली पाहिजे.

Comments
Add Comment

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा

तळोजा-खांदेश्वर मेट्रोला मंजुरी

५ हजार ५७५ कोटींची तरतूद तळोजा  : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो

विषय समित्या सभापती पदांसाठी इच्छुकांची ‘मोर्चेबांधणी’

२३ मार्चला निवडणूक अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी अलिबाग येथे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,