Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गावर मोठमोठे दगड कोसळल्याने नव्या महामार्ग क्रमांक ६६ वर भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.


कोंढवी फाट्याजवळ जुन्या महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी संभाव्य धोक्याची सूचना देणाऱ्या पताका लावण्यात आल्या असून, वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या भेगांमुळे जुना महामार्ग खचून तो थेट नव्या महामार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.



दरम्यान, कातळी भोगावच्या हद्दीत भुयारी मार्ग पूर्ण होताच, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चार ते सहा मोठे दगड पडल्याचे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी माहिती दिली.


या पार्श्वभूमीवर जुना रस्ता तातडीने फोडून संरक्षक उपाययोजना केल्या नाहीत, तर नव्या महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :