क्रिकेटच्या मैदानात धक्काबुक्की, खेळाडूंसह पंचांनाही ढकलले

ढाका : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका युवा क्रिकेटपटूंचा कसोटी सामना सुरू असताना धक्कादायक घटना घडली. दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी एकमेकांवर हात उगारला, धक्काबुक्की केली. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न करणाऱ्या पंचांनाही धक्काबुक्की झाली. भरपूर प्रयत्न करुन पंचांनी सर्व खेळाडूंना शांत केले आणि एकमेकांपासून दूर केले. यानंतर मैदानातील राडा थांबला. या प्रकरणात सामनाधिकाऱ्यांनी मैदानात उपस्थित असलेल्या दोन्ही पंचांकडून अहवाल मागवला आहे. सामनाधिकारी लवकरच दोन्ही बाजूच्या निवडक खेळाडूंवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

रिपोनने एंतुलीच्या चेंडूवर षटकार मारला. नंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानातच संघर्ष झाला. सुरुवातीला दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांकडे रागाने बघत होते. नंतर रिपोन नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या त्याच्या जोडीदाराच्या दिशेने चालत जाऊ लागला. रिपोन चालत नॉन स्ट्रायकर एंडच्या जोडीदाराच्या दिशेने जात होता त्यावेळी एंतुलीने बडबड केली. यामुळे संघर्ष सुरू झाला. आधी धक्काबुक्की नंतर वादावादी आणि हाणामारी झाली. एंतुलीने रिपोनचे हेल्मेट काढून त्याच्याशी वाद घातला तर रिपोनने एंतुलीला बॅट दाखवत वाद वाढवला, प्रकरण चिघळू नये म्हणून पंचांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंचांनाही धक्काबुक्की झाली.

रिपोन आणि एंतुलीमध्ये नेमका कशावरून वाद झाला ते अद्याप समजलेले नाही. पंचांनी मध्यस्थी करून सामना परत सुरू केला. तीन चेंडू झाल्यानंतर एंतुलीने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला आणि रिपोनच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू रिपोने अडवला.समालोचकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन चेंडू झाल्यानंतर एंतुलीने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला आणि रिपोनच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू रिपोने अडवला.

रिपोन व एंतुलीमध्ये नेमका कशावरून वाद झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच हा राडा एवढ्यावरच थांबला नाही. पंचांनी मध्यस्थी करून सामना परत सुरू केला. एंतुलीने रिपोनचं हेल्मेट पकडून ओढलं. आता सामनाधिकारी या खेळाडूंवर काय कारवाई करतात ते बघू असे समालोकांन सांगितले.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली