कावेरी इंजिन : भारताचे आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल!

  80

शत्रूराष्ट्रांनी ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलाय. त्यातच आता भारताने स्वदेशी लढाऊ विमान तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिलाय. कावेरी इंजिन. हो बरोबर आहे. रशियामध्ये कावेरी इंजिनची यशस्वी चाचणी झालीय. हे इंजिन भारताच्या लढाऊ विमानांना बळ देणारं आहे आणि शत्रूराष्ट्रांना धडकी भरवणारं आहे. चला, जाणून घेऊया कावेरी इंजिन आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे भारताची सामरिक शक्ती कशी वाढणार आहे.



भारतानं स्वदेशी लढाऊ विमान तेजस बनवलं,मात्र त्याच्या इंजिनासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता कावेरी इंजिननं ही कमतरता दूर केलीय. डीआरडीओ आणि जीटीआरई यांनी विकसित केलेलं हे टर्बोफॅन इंजिन लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे भविष्यातील घातक विमानांसाठी डिझाईन केलंय. रशियात झालेल्या चाचण्यांमध्ये कावेरी इंजिनचे चार व्हेरिएंट यशस्वी ठरले आहेत. फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर भारताने काम सुरू केलंय आणि या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन.


कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे. स्वदेशी फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं गेलंय. कावेरी इंजिन योजनेची सुरुवात १९८०च्या दशकात सुरू झाली होती. मात्र काही अडचणींमुळे ती थांबली. आता डीआरडीओने २०१६मध्ये पुन्हा या योजनेवर काम सुरू केलं. कावेरी इंजिनमध्ये ४६kN ड्राय थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी शक्ती आहे. तसंच तेजस आणि घातक यूसीएव्ही विमानांना ध्वनीपेक्षा जास्त गती आणि रडारवर न दिसणारी स्टेल्थ क्षमता आहे. शत्रूचे रडार भारताची विमानं शोधू शकणार नाहीत. कावेरी इंजिनमुळे तेजस विमानांना हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.



कावेरी इंजिनमुळे भारत आता अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊ शकणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारताने आता कावेरी इंजिनसह आपली सामरिक ताकद आणखी बळकट केलीय. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना धडकी भरलीय. कावेरी इंजिन आणि त्याच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालाय. कावेरी इंजिन विकसित करून भारताने जगाला पुन्हा एकदा भारताची नवी उड्डाणशक्ती दाखवून दिलीय.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये