कावेरी इंजिन : भारताचे आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल!

  86

शत्रूराष्ट्रांनी ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलाय. त्यातच आता भारताने स्वदेशी लढाऊ विमान तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिलाय. कावेरी इंजिन. हो बरोबर आहे. रशियामध्ये कावेरी इंजिनची यशस्वी चाचणी झालीय. हे इंजिन भारताच्या लढाऊ विमानांना बळ देणारं आहे आणि शत्रूराष्ट्रांना धडकी भरवणारं आहे. चला, जाणून घेऊया कावेरी इंजिन आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे भारताची सामरिक शक्ती कशी वाढणार आहे.



भारतानं स्वदेशी लढाऊ विमान तेजस बनवलं,मात्र त्याच्या इंजिनासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता कावेरी इंजिननं ही कमतरता दूर केलीय. डीआरडीओ आणि जीटीआरई यांनी विकसित केलेलं हे टर्बोफॅन इंजिन लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे भविष्यातील घातक विमानांसाठी डिझाईन केलंय. रशियात झालेल्या चाचण्यांमध्ये कावेरी इंजिनचे चार व्हेरिएंट यशस्वी ठरले आहेत. फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर भारताने काम सुरू केलंय आणि या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन.


कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे. स्वदेशी फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं गेलंय. कावेरी इंजिन योजनेची सुरुवात १९८०च्या दशकात सुरू झाली होती. मात्र काही अडचणींमुळे ती थांबली. आता डीआरडीओने २०१६मध्ये पुन्हा या योजनेवर काम सुरू केलं. कावेरी इंजिनमध्ये ४६kN ड्राय थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी शक्ती आहे. तसंच तेजस आणि घातक यूसीएव्ही विमानांना ध्वनीपेक्षा जास्त गती आणि रडारवर न दिसणारी स्टेल्थ क्षमता आहे. शत्रूचे रडार भारताची विमानं शोधू शकणार नाहीत. कावेरी इंजिनमुळे तेजस विमानांना हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.



कावेरी इंजिनमुळे भारत आता अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊ शकणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारताने आता कावेरी इंजिनसह आपली सामरिक ताकद आणखी बळकट केलीय. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना धडकी भरलीय. कावेरी इंजिन आणि त्याच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालाय. कावेरी इंजिन विकसित करून भारताने जगाला पुन्हा एकदा भारताची नवी उड्डाणशक्ती दाखवून दिलीय.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर