कावेरी इंजिन : भारताचे आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल!

  58

शत्रूराष्ट्रांनी ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलाय. त्यातच आता भारताने स्वदेशी लढाऊ विमान तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिलाय. कावेरी इंजिन. हो बरोबर आहे. रशियामध्ये कावेरी इंजिनची यशस्वी चाचणी झालीय. हे इंजिन भारताच्या लढाऊ विमानांना बळ देणारं आहे आणि शत्रूराष्ट्रांना धडकी भरवणारं आहे. चला, जाणून घेऊया कावेरी इंजिन आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे भारताची सामरिक शक्ती कशी वाढणार आहे.



भारतानं स्वदेशी लढाऊ विमान तेजस बनवलं,मात्र त्याच्या इंजिनासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता कावेरी इंजिननं ही कमतरता दूर केलीय. डीआरडीओ आणि जीटीआरई यांनी विकसित केलेलं हे टर्बोफॅन इंजिन लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे भविष्यातील घातक विमानांसाठी डिझाईन केलंय. रशियात झालेल्या चाचण्यांमध्ये कावेरी इंजिनचे चार व्हेरिएंट यशस्वी ठरले आहेत. फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर भारताने काम सुरू केलंय आणि या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन.


कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे. स्वदेशी फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं गेलंय. कावेरी इंजिन योजनेची सुरुवात १९८०च्या दशकात सुरू झाली होती. मात्र काही अडचणींमुळे ती थांबली. आता डीआरडीओने २०१६मध्ये पुन्हा या योजनेवर काम सुरू केलं. कावेरी इंजिनमध्ये ४६kN ड्राय थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी शक्ती आहे. तसंच तेजस आणि घातक यूसीएव्ही विमानांना ध्वनीपेक्षा जास्त गती आणि रडारवर न दिसणारी स्टेल्थ क्षमता आहे. शत्रूचे रडार भारताची विमानं शोधू शकणार नाहीत. कावेरी इंजिनमुळे तेजस विमानांना हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.



कावेरी इंजिनमुळे भारत आता अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊ शकणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारताने आता कावेरी इंजिनसह आपली सामरिक ताकद आणखी बळकट केलीय. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना धडकी भरलीय. कावेरी इंजिन आणि त्याच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालाय. कावेरी इंजिन विकसित करून भारताने जगाला पुन्हा एकदा भारताची नवी उड्डाणशक्ती दाखवून दिलीय.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत