१४ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

शहापूर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम लहानू सदगीर हा १४ वर्षांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे शहापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मित्रांसोबत प्रेम सदगीर हा क्रिकेट खेळत असतांना चेंडू झुडपात गेल्याने तो काढतांना साप चावल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान प्रेमचा मृत्यू झाला.


एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडीलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला या घटनेनंतर उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली. दरम्यान नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तर या ठिकाणी रुग्णाला रूग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत मात्र दुर्दैवी घटना घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता