जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

मंबई : दरवर्षी दहा जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होते. पण यंदा मे महिन्यात म्हणजे जवळपास दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत येऊन धडकला. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून २०२५ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०८ टक्के जास्त असेल. यामुळे यंदा जून महिन्यात मागील सोळा वर्षांचे पावसाचे रेकॉर्ड मोडीत निघतील, जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला असला तरी २८ किंवा २९ मे पासून ५ जून पर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नियमानुसार भरपाई देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.
Comments
Add Comment

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात