जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

मंबई : दरवर्षी दहा जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होते. पण यंदा मे महिन्यात म्हणजे जवळपास दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत येऊन धडकला. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून २०२५ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०८ टक्के जास्त असेल. यामुळे यंदा जून महिन्यात मागील सोळा वर्षांचे पावसाचे रेकॉर्ड मोडीत निघतील, जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला असला तरी २८ किंवा २९ मे पासून ५ जून पर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नियमानुसार भरपाई देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.
Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,