Vegetables price hike: पावसामुळे भाज्या महागल्या, किरकोळ बाजारात भाजीपाला 100 च्या पार, जाणून घ्या आजचे दर

पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, काही दिवस भाजीपाल्याचा उच्चांक कायम 


नवी मुंबई: राज्यात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामधील भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


परिणामी, एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली (Rain Hits Vegetables Supply) आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पावसाआधी ६०० ते ७०० गाड्या मार्केटमध्ये होत्या. पण पावसानंतर बाजारात आता फक्त ४०० ते ४५० गाड्यांचीच आवक होत आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही (Vegetables price hike) झाला आहे.



पुढील काही दिवस भाज्या महागच


सध्या बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहे. ग्राहकांना याचा फटका भाजीपाला दरवाढीच्या स्वरूपात बसला आहे. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात शेवगा 160 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर 100 ते 130 रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.



किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)



  • शेवगा 150-160 रुपये

  • शिमला मिरची 100-110 रुपये

  • फ्लॉवर 120-130 रुपये

  • गवार 120-130 रुपये

  • टोमॅटो 50-60 रुपये

  • वांगी 60-70 रुपये

  • गाजर 60-70 रुपये

  • काकडी 60-70 रुपये

  • भेंडी 80-90 रुपये

  • कार्ली 80-90 रुपये


पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी):



  • कोथिंबीर 50 रुपये

  • मेथी 50 रुपये

  • पालक 50 रुपये

Comments
Add Comment

उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे