Vegetables price hike: पावसामुळे भाज्या महागल्या, किरकोळ बाजारात भाजीपाला 100 च्या पार, जाणून घ्या आजचे दर

पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, काही दिवस भाजीपाल्याचा उच्चांक कायम 


नवी मुंबई: राज्यात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामधील भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


परिणामी, एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली (Rain Hits Vegetables Supply) आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पावसाआधी ६०० ते ७०० गाड्या मार्केटमध्ये होत्या. पण पावसानंतर बाजारात आता फक्त ४०० ते ४५० गाड्यांचीच आवक होत आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही (Vegetables price hike) झाला आहे.



पुढील काही दिवस भाज्या महागच


सध्या बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहे. ग्राहकांना याचा फटका भाजीपाला दरवाढीच्या स्वरूपात बसला आहे. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात शेवगा 160 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर 100 ते 130 रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.



किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)



  • शेवगा 150-160 रुपये

  • शिमला मिरची 100-110 रुपये

  • फ्लॉवर 120-130 रुपये

  • गवार 120-130 रुपये

  • टोमॅटो 50-60 रुपये

  • वांगी 60-70 रुपये

  • गाजर 60-70 रुपये

  • काकडी 60-70 रुपये

  • भेंडी 80-90 रुपये

  • कार्ली 80-90 रुपये


पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी):



  • कोथिंबीर 50 रुपये

  • मेथी 50 रुपये

  • पालक 50 रुपये

Comments
Add Comment

अवधूत साठे यांनी सेबीला साफ 'नाकारले' साठे ट्रेडिंग ॲकेडमी सेबी निर्णयाला आव्हान देणार

मुंबई: अवधूत साठे यांच्या अवधूत साठे ट्रेडिंग ॲकेडमी लिमिटेड (ASTAL) कंपनीने सेबीच्या आरोपांना फेटाळले असून

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई: राज्य

पाक-अफगाण सीमेवर पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती! शेकडो कुटुंबांनी सोडली घरं

कराची: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. काल (५ डिसेंबर)रात्री उशिरा चमन

भारत व रशिया यांच्यातील अणुभट्ट्या प्रकल्पांना वेग पुतीन व मोदी यांच्यात महत्वाची चर्चा

नवी दिल्ली: भारत व रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देश आता नव्या एकत्र येत

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि