अवकाळी पावसामुळे महिला गृहोद्योगांची गणिते कोलमडली

शैलेश पालकर


पोलादपूर : यंदा ९ मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेमध्ये कमतरता निर्माण झाली असून महिला गृहोद्योगांची गणितेदेखील अवकाळी पावसामुळे यंदा चुकल्यामुळे लाडक्या बहिणींच्या या महिला गृहोद्योगांना राज्यसरकारने साथ देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांची निर्मिती मोठ्या संख्येने झाली असून अनेक महिला बचतगटांमार्फत सुरू असलेल्या महिला गृहोद्योगांना सूक्ष्म कर्ज, लघू कर्ज आणि मध्यम कर्जांचे वाटपदेखील करण्यात आले आहे. यापैकी अनेक महिला बचतगटांना ही कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तथाकथित समाजसेवकाने बचतगटातील आठपैकी सात महिलांची कर्ज हडपून एका महिलेच्या सूक्ष्म कर्जात बचतगटाचे रोजगार निर्मिती व सक्षमीकरणाचे काम सुरू ठेवण्याचे भोंगळ मार्गदर्शन करताना पहिल्या कच्च्या मालाचा वापर होऊन तो संपण्यापूर्वीच पुढच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याची हमी देत हा समाजसेवक गाशा गुंडाळून पसार झाला आहे. यातच अवकाळी पाऊस झाल्याने वाळवणीच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे आडाखे बांधणाऱ्या महिला गृहोद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

अवकाळी पावसामुळे गृहोद्योग नुकसानीत


महाड तालुक्यातील नाते येथील देवळेकरबंधू गृहोद्योगाच्या संचालिका अस्मिता देवळेकर यांनी, लाडक्या बहिणींनी त्यांच्या सानुग्रह अनुदानाद्वारे घरच्याघरी उद्योगनिर्मिती केली आणि पावसाने या लाडक्या बहिणींवर वक्रदृष्टी केल्यामुळे हे गृहोद्योग अवकाळी पावसामुळेच यंदा नुकसानीत गेले असल्याचे सांगितले असून बँकांची सूक्ष्म कर्ज फेडून बँका वाचविता येतील मात्र, संसार वाचविण्यासाठी महिलांचे गृहोद्योग वाचविले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा करून महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत महिला गृहोद्योगांना आर्थिक अनुदान देऊन यंदा अवकाळीच्या संकटातून तारण्याची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.
Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग