न्याहाडी नदीचा पूल, बनलाय मृत्यूचा सापळा

  31

नदीच्या पुलाला संरक्षण कठड्यांचा अभाव


मुरबाड :मुरबाड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या न्याहाडी, चासोळे व हेदवली पुलांना संरक्षक कठडे नाहीत, या पुलांवरुन दुर्गम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकऱ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अरुंद पुलामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने वेळोवेळी अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने हे पूल म्हणजे मृत्युचा सापळा बनले आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


या पुलावरील नदीला पूर आल्यानंतर येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. तसेच पुलांना संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हेदवली, चासोळे व न्याहाडी पुलावर संरक्षण कठडे न उभारल्यास करचोंडे, चासोळे, मेर्दी न्याहाडी व वाल्हीवरे ह्या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर सर, मेर्दी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे व संतोष देशमुख यांनी दिला आहे.



आदिवासी गाव-पाड्यामधील मोठ्या प्रमाणात नागरिक चासोळे,हेदवली व न्याहाडी पुलावरू न ये-जा करीत असतात. या तिन्ही पुलांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी रेलिंग उभारण्यासंबंधीचे पत्र १३ जुलै २०२३ रोजी समाजसेवक प्रकाश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. हेदवली पुलाची अवस्था फारच दयनीय
झाली आहे.


सदर पुलावर होणारी वाहतूक आणि त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी लवकरच त्या पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी कठडे तयार केले जातील
- कैलास पतींगराव, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या