न्याहाडी नदीचा पूल, बनलाय मृत्यूचा सापळा

नदीच्या पुलाला संरक्षण कठड्यांचा अभाव


मुरबाड :मुरबाड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या न्याहाडी, चासोळे व हेदवली पुलांना संरक्षक कठडे नाहीत, या पुलांवरुन दुर्गम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकऱ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अरुंद पुलामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने वेळोवेळी अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने हे पूल म्हणजे मृत्युचा सापळा बनले आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


या पुलावरील नदीला पूर आल्यानंतर येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. तसेच पुलांना संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हेदवली, चासोळे व न्याहाडी पुलावर संरक्षण कठडे न उभारल्यास करचोंडे, चासोळे, मेर्दी न्याहाडी व वाल्हीवरे ह्या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर सर, मेर्दी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे व संतोष देशमुख यांनी दिला आहे.



आदिवासी गाव-पाड्यामधील मोठ्या प्रमाणात नागरिक चासोळे,हेदवली व न्याहाडी पुलावरू न ये-जा करीत असतात. या तिन्ही पुलांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी रेलिंग उभारण्यासंबंधीचे पत्र १३ जुलै २०२३ रोजी समाजसेवक प्रकाश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. हेदवली पुलाची अवस्था फारच दयनीय
झाली आहे.


सदर पुलावर होणारी वाहतूक आणि त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी लवकरच त्या पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी कठडे तयार केले जातील
- कैलास पतींगराव, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड

Comments
Add Comment

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन