न्याहाडी नदीचा पूल, बनलाय मृत्यूचा सापळा

नदीच्या पुलाला संरक्षण कठड्यांचा अभाव


मुरबाड :मुरबाड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या न्याहाडी, चासोळे व हेदवली पुलांना संरक्षक कठडे नाहीत, या पुलांवरुन दुर्गम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकऱ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अरुंद पुलामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने वेळोवेळी अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने हे पूल म्हणजे मृत्युचा सापळा बनले आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


या पुलावरील नदीला पूर आल्यानंतर येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. तसेच पुलांना संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हेदवली, चासोळे व न्याहाडी पुलावर संरक्षण कठडे न उभारल्यास करचोंडे, चासोळे, मेर्दी न्याहाडी व वाल्हीवरे ह्या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर सर, मेर्दी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे व संतोष देशमुख यांनी दिला आहे.



आदिवासी गाव-पाड्यामधील मोठ्या प्रमाणात नागरिक चासोळे,हेदवली व न्याहाडी पुलावरू न ये-जा करीत असतात. या तिन्ही पुलांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी रेलिंग उभारण्यासंबंधीचे पत्र १३ जुलै २०२३ रोजी समाजसेवक प्रकाश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. हेदवली पुलाची अवस्था फारच दयनीय
झाली आहे.


सदर पुलावर होणारी वाहतूक आणि त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी लवकरच त्या पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी कठडे तयार केले जातील
- कैलास पतींगराव, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य