न्याहाडी नदीचा पूल, बनलाय मृत्यूचा सापळा

  29

नदीच्या पुलाला संरक्षण कठड्यांचा अभाव


मुरबाड :मुरबाड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या न्याहाडी, चासोळे व हेदवली पुलांना संरक्षक कठडे नाहीत, या पुलांवरुन दुर्गम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकऱ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अरुंद पुलामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने वेळोवेळी अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने हे पूल म्हणजे मृत्युचा सापळा बनले आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


या पुलावरील नदीला पूर आल्यानंतर येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. तसेच पुलांना संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हेदवली, चासोळे व न्याहाडी पुलावर संरक्षण कठडे न उभारल्यास करचोंडे, चासोळे, मेर्दी न्याहाडी व वाल्हीवरे ह्या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर सर, मेर्दी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे व संतोष देशमुख यांनी दिला आहे.



आदिवासी गाव-पाड्यामधील मोठ्या प्रमाणात नागरिक चासोळे,हेदवली व न्याहाडी पुलावरू न ये-जा करीत असतात. या तिन्ही पुलांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी रेलिंग उभारण्यासंबंधीचे पत्र १३ जुलै २०२३ रोजी समाजसेवक प्रकाश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. हेदवली पुलाची अवस्था फारच दयनीय
झाली आहे.


सदर पुलावर होणारी वाहतूक आणि त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी लवकरच त्या पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी कठडे तयार केले जातील
- कैलास पतींगराव, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या