Dahisar Crime: "हे त्यांच्या अब्बाचं लाहोर किंवा पाकिस्तान नाहीय" दहिसर तिहेरी हत्याकांड प्रकरणी नितेश राणे आक्रमक

दहिसर पश्चिम येथील दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हल्ला प्रकरणी पिडीत हिंदू कुटुंबाला नितेश राणे यांची भेट  


दिनांक १८ मे रोजी मुंबईतील दहिसरमध्ये किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत ३ जणांचा मृत्यू झाला. गणपत पाटील नगर झोपडपट्टी भागात रविवारी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला. ज्यात मृत्यूमुखी पडलेल्या पीडित गुप्ता कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी १८ मे २०२५ रोजी भेट घेतली. त्यांना दिलासा देत, असे हल्ले सहन करून घेतले जाणार  नाही असे संबंधित हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे.



"आम्ही येथे एक हिंदू म्हणून आलो आहोत"


१८ मे रोजी दहिसर पश्चिमेतील दोन कुटुंबांमधील भांडणात तीन जणांची हत्या झाली होती. ज्यामध्ये गुप्ता आणि शेख कुटुंब एकमेकांवर हिंसक पद्धतीने तुटून पडले होते. या हिंसक संघर्षात हल्ला झालेल्या गुप्ता कुटुंबाची नितेश राणे यांनी भेट घेतली. "मी पीडित कुटुंबाला भेटायला आलो आहे. माझी बहीण माझ्यासोबत आहे, आमचे आमदारही आमच्यासोबत होते. आज आम्ही सर्व हिंदू म्हणून एकत्र आलो आहोत, मंत्री किंवा आमदार म्हणून नाही - आम्ही येथे एक हिंदू म्हणून आलो आहोत," असे राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.


राणे पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या मुंबईत याप्रकारचे हल्ले होऊ देणार नाही. ,  हे त्यांच्या अब्बाचे लाहोर किंवा पाकिस्तान नाहीय. ही आमच्या हिंदुराष्ट्राची मुंबई आहे."  नितेश राणे यांनी दहिसर येथे वाढत चाललेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांच्या संख्येवरही आगपाखड केली आहे.





काय आहे प्रकरण?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० वाजता अरमान शेख दारूच्या नशेत गणपत पाटील नगर स्ट्रीटवरील राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानात आल्यावर हाणामारी सुरू झाली. अरमान आणि गुप्ता यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर दोघांनीही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला. त्यानंतर गुप्ताचे मुलगे अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता हे घटनास्थळी धावले आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि हसन हमीद शेख अरमानला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबांमधील जोरदार वादाचे रूपांतर लवकरच हिंसक झाले. या लोकांनी चाकू आणि कोयता यांसारख्या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. या हाणामारीदरम्यान, राम गुप्ता (५०), अरविंद गुप्ता (२३) हे बापलेक आणि हमीद शेख (४९) गंभीर जखमी झाले. त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


एमएचबी पोलिसांनी या घटनेसंबंधीत क्रॉस मर्डरचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत आणि फॉरेन्सिक पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून नमुने गोळा केले आहेत. सध्या पोलिसांकडून साक्षीदारांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि