Mumbai Rain : मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस! मेट्रो स्थानकात गळती, अंधेरी सबवे जलमय!

  59

मुंबई : पावसाने बुधवारी दुपारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने मुंबई-ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाला आणि मुंबईत अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.



मेट्रो स्टेशनवर गळती, बादल्या ठेऊन पाणी अडवण्याचा प्रयत्न!


मेट्रो ३ च्या वरळी स्थानकात तिकीट काउंटरजवळ छत गळायला लागलं. गळती थांबवण्यासाठी बादल्या ठेवल्या गेल्या आणि कर्मचाऱ्यांनी सतत पाणी फेकत परिस्थिती सावरली. याआधीही आचार्य अत्रे स्थानकावर अशीच गळती झाली होती. प्रवाशांनी संताप व्यक्त करत तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.



उपनगरीय रेल्वे विस्कळीत, अंधेरी सबवे जलमय!


मध्य रेल्वे २०-२५ मिनिटे तर पश्चिम रेल्वे ५-१० मिनिटे उशिराने धावत आहे. अंधेरी सबवे मध्ये २-३ फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.



भिवंडीमध्ये पाणीच पाणी!


दुपारनंतर भिवंडीत जोरदार पावसाने हजेरी लावली. भाजी मार्केट आणि तीनबत्ती परिसरात २ फूटांपर्यंत पाणी साचलं, नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे.



सिंधुदुर्गात रेड अलर्ट, एनडीआरएफ तैनात


तळकोकणात रेड अलर्ट जारी. सिंधुदुर्गात पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची तुकडी दाखल. अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता