मणिपूरमध्ये पुन्हा स्थापन होणार रालोआचे सरकार ?

इंफाळ : राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वाच रालोआचे पुन्हा एकदा सरकार स्थापन होण्याची चिन्हं आहेत. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवार २८ मे २०२५ रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना थोकचोम राधेश्याम सिंह यांनी राज्यातले ४४ आमदार नवीन सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, असे जाहीर केले. इतर नऊ आमदारांसह एकूण ४४ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेस तयार असल्याचे सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली.


केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातले आमदार पुढील निर्णय घेतील, असे भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी सांगितले. मणिपूरचे विधानसभाध्यक्ष सत्यव्रत यांनी ४४ आमदारांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांकडून सत्तास्थापनेसाठी एकत्र आल्याची खात्री करुन घेतली.


मणिपूरमध्ये पुन्हा रालोआचे सरकार आले तर एन. बिरेन सिंह हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मागच्या सरकारच्या काळात कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली आणि यंदाच्या सरकारमध्ये राजकीय संघर्षामुळे दोन वर्षे वाया गेली आहेत. कुकी आणि जोस या दोन प्रमुख जातींमधील संघर्षाला हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा एन. बिरेन सिंह हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. याआधी जातीय संघर्ष हाताळण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्याच गळ्यात नव्याने मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.


सध्या मणिपूरच्या ६० सदस्यांच्या विधानभेत ५९ सदस्य आहेत. एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे ४४ आमदार आहेत. यात ३२ मैतेईंचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार, तीन मणिपूरचे मुसलमान आमदार आणि इतर नऊ आमदार आहेत.


काँग्रेसकडे फक्त पाच मैतेई आमदार आहेत. या व्यतिरिक्त १० कुकी आमदार आहेत. यापैकी सात जणांनी भाजपाच्या तिकिटावर मागील निवडणुकीत विजय मिळवला होता, दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आहे.


मणिपूर विधानसभा एकूण सदस्य संख्या ६०
भाजपा आमदार ३२
एनपीपी आमदार ७
एनपीएफ आमदार ५
जेडीयू आमदार ६ (या सहा पैकी पाच जणांनी भाजपात प्रवेश केला आहे)
काँग्रेस आमदार ५
इतर आमदार ५


एका आमदाराच्या मृत्यूमुळे विधानसभेतील आमदार संख्या आता ५९* झाली आहे

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे