इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यांमधून कर्णधार शुभमन गिलची अचानक माघार

मुंबई : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना २० जूनपासून सुरू होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे. भारताच्या निवड समितीने या दौऱ्यासाठी मागच्या आठवड्यात संघ निवडला आहे.शुभमन गिलला या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. परंतु गिल या दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. त्याने या दोन सामन्यांसाठी आपले नाव मागे घेतले आहे.


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळणार आहे. या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे. शुभमन गिल इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता आणि आता त्याने दुसऱ्या सामन्यातूनही आपले नाव मागे घेतले आहे.या मागचे कारण समोर आले आहे. गिलला इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती देण्यात आली आहे.


इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील पहिला सामना 30 मे ते 2 जून दरम्यान आणि दुसरा सामना 6 ते 9 जून दरम्यान खेळला जाणार आहे. अभिमन्यू ईश्वरनला इंडिया अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अभिमन्यूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अभिमन्यूला भारतीय संघातही संधी देण्यात आली आहे. या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा कोणताही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून