लग्नाच्या आमिषाने पुण्याच्या भामट्याने ठाण्याच्या ७३ वर्षीय महिलेला फसवले!

५७ लाखांचा गंडा घालणारा ६२ वर्षीय ठग फरार, पुण्यात घर घेण्याच्या नावाखाली लुटलं!


ठाणे : 'लग्न करून सुखसमृद्ध आयुष्य जगू', असे सांगत पुण्याच्या एका ६२ वर्षीय भामट्याने ७३ वर्षांच्या महिलेला तब्बल ५७ लाखांना गंडवले आहे. सध्या हा आरोपी फरार असून ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोडवरील पीडित महिलेला हा आरोपी वधूवर सूचना जाहिरातीद्वारे भेटला. प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्यासाठी ३५ लाख रुपये तिच्याकडून घेतले. यासाठी बोगस कागदपत्रं आणि बनावट पावत्या वापरल्या.



यानंतर तो महिलेकडे राहायला आला आणि सुमारे २० लाखांचे सोने लंपास केले. इतकंच नव्हे, तर तिचे डेबिट कार्ड वापरून २.४ लाख काढले आणि शेवटी गायब झाला.


फसवणूक झालेल्या महिलेने यासंदर्भात विश्रू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर म्हणाले, 'आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

Comments
Add Comment

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

Digital Registration : प्रकल्प बाधितांच्या पात्रतेची डिजिटल नोंदणी करा

- भाजप नगरसेविकेची अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक

Marathi Bhavan : इतर भाषिकांचे मुंबईत भवन, मराठी भवन का नाही?

- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत

Mayor's Residence : महापौरांच्या निवासस्थानाचे होणार नुतनीकरण

- रितू तावडे यांचा गृहप्रवेश लांबणीवर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) मुंबई महापौर पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रितू

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनणार कार्यकारी अभियंता

- स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील कार्यकारी

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर