दक्षिण मुंबईकरांसाठी बुधवार, गुरूवारी पाणीबाणी

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे 'ई' विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत नवानगर, डॉकयार्ड मार्ग येथील जुनी १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करून, नवीन १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच भंडारवाडा जलाशयाचा कप्पा १ वरील ९०० मिलिमीटर व्यासाचे जुने जलद्वार काढून नवीन ९०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहेत.


हे काम गुरुवारी २९ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीमध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा ते भायखळा, माझगाव आदी परिसरातील काही भागांत १०० टक्के पाणीकपात केली जाणार असून काही भागांमध्ये अंशतः पाणीकपात करण्यात येणार आहे या परिसरातील नागरिकांनी, या जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या आधी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा.


तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच या जलवाहिनीच्या कामानंतर संबंधित परिसरांमध्ये पुढील दोन दिवस कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



हे पॉइंटर्स


नेव्हल डॉकयार्ड पाणीपुरवठा परिक्षेत्र- सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डि'मेलो मार्ग, बाबूला टँक परिक्षेत्र, डोंगरी 'ब'परिक्षेत्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र- संपूर्ण मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र, मध्य रेल्वे - रेल्वे यार्ड, भायखळा पश्चिम, मुंबई सेंट्रल, बाबूला टँक, चिंचपोकळी, काळाचौकी, माझगाव, डॉकयॉर्ड, जे जे रुग्णालय परिसर, भायखळा पूर्व आदी परिसरात पाणीकपात करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे

Mumbai Encroachment Crackdown : वांद्रे येथील 'गरीब नगर'मध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ५ दिवसीय महा-पाडकाम मोहिमेला सुरुवात मुंबई : मुंबईतील वांद्रे (Bandra) पूर्व भागात