ठाणे कारागृहातील बंदी बनणार कुशल फोटोग्राफर

  40

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभिनव उपक्रम


ठाणे :समाजाने फेटाळलेले, गुन्हेगारीच्या चक्रात सापडलेले आणि आपल्या चुकीच्या निर्णयामुळे जीवनात मागे पडलेले अनेक बंदी ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, या बंदींना त्यांच्या आयुष्यात नव्याने सुरुवात करण्याची, एक नवी दिशा मिळवण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहानें दिली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात डिजिटल फोटोग्राफी आणि व्हीडिओ हा विशेष अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमातून कारागृहातच बंदींना छायाचित्रणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात बंदींनी जबरदस्त उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.



या उपक्रमामध्ये ठाण्याचे ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल्ल गांगुर्डे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे त्यांनी आपले सामाजिक भान राखत बंदींना प्रशिक्षण दिले आहे. आपल्या अनुभवाचा खजिना खुला करत या बंदींना छायाचित्रणाची मूलभूत तत्त्वे, कॅमेरा हाताळणी, फ्रेमिंग, प्रकाशाचा वापर, स्टोरीटेलिंग आणि फोटो जर्नलिझम यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या आहेत. प्रशिक्षणाचे वर्ग आठवड्यातून दोन वेळा घेतले जात आहेत. सध्या या बंदींची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून येत्या जून महिन्यात अंतिम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंदींना विद्यापीठाचं अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ठाणे कारागृह यांचा संयुक्त सहभाग आहे.


फोटोग्राफीचे हे प्रशिक्षण म्हणजे केवळ कॅमेराशी ओळख नव्हे, तर एक नवीन संधीची पहाट आहे. जेव्हा हे बंदी शिक्षण पूर्ण करून कारागृहाबाहेर पडतील, तेव्हा त्यांच्या हातात कौशल्य असेल-ज्याच्या आधारे ते रोजगार मिळवू शकतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील किंवा किमान नवा मार्ग शोधू शकतील. आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून बंदीवानांना प्रशिक्षण द्यावेसे वाटले आणि ही संधी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठने दिली. सुरुवातीला ही लोकं गुन्हेगार वाटायचे, पण हळूहळू त्यांच्यातील माणूस माझ्या समोर उभा राहिला. आता ते मनापासून शिकत आहेत, असे मत छायाचित्रकार प्रफुल्ल गांगुर्डे यांनी मांडले आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या